शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

EVM म्हणजे एव्हरी वोट फॉर मोदी - योगी आदित्यनाथ

By admin | Published: April 29, 2017 8:30 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी गोरखपूर येथे ईव्हीएम म्हणजे "एव्हरी वोट फॉर मोदी" असा नवा फुलफॉर्म सांगितला.

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 29 -  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी गोरखपूर येथे ईव्हीएमचा नवा फुल फॉर्म सांगितला. ईव्हीएम म्हणजे "एव्हरी वोट फॉर मोदी" असा नवा फुलफॉर्म त्यांनी सांगितला. 
 
त्यांच्या या विधानाचाच दाखला देत आता विरोध ईव्हीएम गोंधळाचा विषय आणखी वाढवण्याची शक्यता आहे. कारण ईव्हीएममधील कोणतेही बटण दाबले की भाजपलाचा मत जाते, असा आरोप विरोधी पक्षातील नेते करत आहेत.  
बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 
 
ईव्हीएमबाबत विरोधक अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. जी लोकं स्वतः ईव्हीएमद्वारे निवडून आले ती स्वतः ईव्हीएमसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ईव्हीएमसोबत कुणी छेडछाड करेल तर ती स्वतःहून बंद पडेल, असेही ते यावेळी म्हणालेत. 
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूरचा हा दुसरा दौरा आहे. 
यावेळी त्यांनी राज्यातील गुन्हेगारांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. कायदा हातात घ्यायचा असेल तर राज्य सोडा, अशा शब्दांत त्यांनी गुन्हेगारांना ठणकावले आहे.
 
दरम्यान, 30 एप्रिलपर्यंत योगी येथे राहणार आहेत. भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना योगी म्हणाले की, महिन्याभरात कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा आणणार असून कायदा हाती घेणा-यांची सुटका होणार नाही. 
महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसंच शेतक-यांच्या अधिकारांमध्येही  तडजोड केली जाणार नाही, असेही ते यावेळी म्हणालेत. उत्तर प्रदेशला विकास आणि सुरक्षेच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ बनवायचे आहे. यासाठी तुमचे सहकार्य हवे, असल्याचेही आवाहन योगींनी कार्यकर्त्यांना केले. 
 

दरम्यान,  उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ईव्हीएममध्ये गौडबंगाल असल्याचा मुद्दा उपस्थित करत यामागे भाजपा असल्याचा आरोप केला होता.  आता मायावती व केजरीवाल यांच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळाले.   
 
तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबवणं आवश्यक आहे, अशा आशयाचे ट्विट अखिलेश यांनी केले आहे. इंटरनेट कनेक्शनशिवाय रिमोटद्वारे चिपच्या सहाय्याने पेट्रोल चोरी केली जाऊ शकते, त्याचप्रमाणे ईव्हीएममध्येही छेडछाड होणं शक्य आहे, असे ट्विट करत अखिलेश यांनी ईव्हीएम गोंधळावरुन भाजपाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.  उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मायावती यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत भाजपावर हल्लाबोल चढवला होता.