शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व धोक्यात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 12:12 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबद्दल न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्र लिहिलं आहे. कॉलेजियमच्या शिफारसीनंतरही न्यायाधीशांच्या नियुक्तीला उशीर होत असल्याबद्दल जोसेफ यांनी चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व धोक्यात असल्याचं जोसेफ यांनी मिश्रा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 'कॉलेजियमच्या शिफारसीनंतरही न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना उशीर होत आहे. या समस्येवर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे,' असं न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीत होत असल्याबद्दल विलंबाबद्दल जोसेफ यांनी चिंता व्यक्त केली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 'सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात कोणतंही पाऊल न उचलल्यास इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही,' असं जोसेफ यांनी पत्रात म्हटलं आहे.वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस कॉलेजियमनं फेब्रुवारीत केली होती. मात्र या शिफारसींचं अद्याप काहीही झालेलं नाही. त्यामुळेच न्यायाधीश जोसेफ यांनी अतिशय कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. 'कॉलेजियमच्या शिफारसीला तीन महिने होऊन गेलेत. मात्र अद्याप न्यायाधीशांची नियुक्ती झालेली नाही. इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे,' असं जोसेफ यांनी पत्रात म्हटलं आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपा