शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे मार्ग सांगा

By admin | Published: March 28, 2017 1:44 AM

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी काय पावले उचलण्यात येणार आहेत याची माहिती द्या

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी काय पावले उचलण्यात येणार आहेत याची माहिती द्या, अशी विचारणा सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली. सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड व न्या. एस. के. कौल यांच्या पीठाने म्हटले आहे की, हा मुद्दा गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास राज्यांनी काय पावले उचलली आहेत त्याची माहिती केंद्र सरकारने चार आठवड्यांच्या आत न्यायालयास द्यावी. न्यायालयाने म्हटले आहे की, शेतकरी असे टोकाचे पाऊल का उचलतात यामागच्या कारणांचा शोध घेऊन त्याचे निराकरण करणारे धोरण सरकारने आणायला हवे. यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिम्हा यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना थेट धान्य उपलब्ध करुन देणे, विम्याचे संरक्षण वाढविणे, कर्ज देणे, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देणे यासारखे पाऊले सरकार उचलत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार एक धोरण आणत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, कृषी हा राज्यांचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे शोधून त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्राने राज्यांशी समन्वय करावा आणि संबंधित योजना आणाव्यात. याचिकाकर्ती एनजीओ ‘सिटीजन्स रिसोर्स अँड अ‍ॅक्शन अँड इनिशिएटिव्ह’ची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कोलिन गोन्सालविस यांनी सांगितले की, वर्षभरात ३००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सरकारने यावर विचार करून एक निश्चित धोरण आखायला हवे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर चिंता व्यक्त करताना न्यायालयाने अगोदर म्हटले होते की, मूळ समस्या सोडविण्यास सरकार चुकीच्या दिशेने जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)