शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Explainer : ३ राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही CMपदाच्या नावांना उशीर; हे आहे सर्वात मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 16:38 IST

विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतरही भाजपकडून मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर का होत नाहीत, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

देशातील पाच राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपला पुन्हा 'अच्छे दिन' आले आहेत. कारण भाजपने राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांत काँग्रेसच्या ताब्यातील सत्ता खेचून आणण्यात आणि मध्य प्रदेशात आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे. मात्र निवडणूक निकाल जाहीर होऊन तीन दिवस उलटून गेल्यानंतरही भाजपने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना आणि केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारखे कठोर निर्णय घेण्यासाठी ओळखले जाणारे नेते असतानाही भाजपकडून मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर का होत नाहीत, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या विलंबामागे जी काही कारणे आहेत, त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुका हे सर्वांत महत्त्वाचं कारण असण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांना बहुमताचा आकडा पार करण्याची किमया साधली. हीच कामगिरी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्याचं आव्हान पक्षासमोर आहे. त्यादृष्टीने भाजपने तयारी सुरू केली असून केंद्र सरकारच्या योजना घराघरात पोहोचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत ज्या राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे, त्या राज्यांमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत मिळून लोकसभेच्या ६५ जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यातील तब्बल ६२ जागा जिंकल्या होत्या. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा मानस आहे. त्यामुळेच या तीनही राज्यांत मुख्यमंत्र्यांची निवड करताना भाजपकडून सावध पावलं टाकली जात आहेत. 

लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या जास्तीत जास्त निवडून आणू शकेल, असे चेहरे या राज्यांमध्ये मुख्यमंत्री म्हणून देण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान, राजस्थानात वसुंधराराजे आणि छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वांचा पर्याय असतानाही भाजपकडून इतर नेत्यांच्या नावाचाही मुख्यमंत्रिपदासाठी विचार केला जात असल्याचे समजते.

राजस्थानात काय आहे स्थिती?

राजस्थानात वसुंधराराजे या गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं नेतृत्व करत आहेत. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी वसुंधराराजे यांचं फारसं सख्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असते. यामुळेच वसुंधराराजे यांना विधानसभा निवडणूक प्रचारावेळी पक्षाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणं भाजपनं टाळलं होतं. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी वसुंधराराजे यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरू असली तरी मोदी-शहा त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवराजसिंह चौहानांबाबत काय होणार?

शिवराजसिंह चौहान यांनी जवळपास २० वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. मध्य प्रदेशात प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या शिवराजसिंह चौहान यांचे मागील काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही मुद्द्यांवरून मतभेद झाल्याचं बोललं जात होतं. त्याचाच परिणाम म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचार यंत्रणा राबवत असताना भाजपकडून 'मोदी के मन मे एमपी और एमपी के मन मे मोदी' असं म्हणत संपूर्ण प्रचार मोदी यांच्या भोवतीच फिरेल, यासाठी प्रयत्न केला जात होता. मात्र निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली तसतसं कसलेले राजकारणी असलेल्या शिवराजसिंह यांनी आपल्या सत्ताकाळात राबवलेल्या योजनांचे मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग करत आपल्याला मुख्य प्रवाहापासून वेगळं केलं जाणार नाही, याची दक्षता घेतल्याचं बघायला मिळालं. त्यातच भाजपला १६३ जागांसह प्रचंड बहुमत मिळाल्याने शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवणं मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी तितकसं सोपं असणार नाही. त्यामुळे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा चौहान हेच विराजमान होणार की मोदी-शहा धक्कातंत्राचा वापर करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक