शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

Explainer: PM मोदींचा जो नारा कार्यकर्त्यांना 'भावला', तोच भाजपाला 'भोवला'; INDIA ने अचूक डाव साधला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 16:05 IST

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदललं जाणार, या विरोधकांच्या प्रचाराचा भाजपला फटका बसणार असल्याचं निरीक्षण राजकीय जाणकार निवडणुकीदरम्यान नोंदवत होते.

Lok Sabha Election Result ( Marathi News ) : देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला असून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र मागील दोन टर्ममध्ये स्वबळावर बहुमत मिळवणाऱ्या भाजपला यंदा मात्र २४० जागांवर रोखण्यात यश मिळवल्याने विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या गोटातही आनंदाचं वातावरण आहे. राम मंदिर, कलम ३७० हटवणे आणि पायभूत सुविधांबाबत झालेलं काम, या मुद्द्यांच्या आधारे आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि एनडीए ४०० जागांचा आकडा पार करेल, असा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "अब की बार, चारसो पार" अशी घोषणाही दिली होती. मात्र या घोषणेनंच भाजपचा घात केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

"देशात सत्तेत यायला तर २७२ जागा लागतात, पण भाजपला ४०० हून जास्त जागा हव्या आहेत, कारण त्यांना संविधान बदलायचं आहे," असं निवडणूक काळात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांनी सांगायला सुरुवात केली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे तर प्रत्येक सभेत संविधानाची प्रत घेऊन जात लोकांना संविधान वाचवण्याचं आवाहन करत होते. तसंच उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनीही हा मुद्दा प्रभावीपणे लोकांसमोर मांडून ही संविधान वाचवण्याची निवडणूक असल्याचं सांगितलं. त्यातच भाजपच्याही काही नेत्यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर संविधानात बदल करणार असल्याचं वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे हळहळू जनमाणसात विशेषत: दलित समाजात हा मुद्दा रुजल्याचं पाहायला मिळालं. 

संविधान बदललं जाणार, या विरोधकांच्या प्रचाराचा भाजपला फटका बसणार असल्याचं निरीक्षण राजकीय जाणकार निवडणुकीदरम्यान नोंदवत होते. आता निवडणुकीनंतर एनडीएतील विविध नेत्यांनीही ही बाब मान्य केली आहे. निकालापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संविधानाचा मुद्दा लोकांच्या डोक्यातून काढता काढता आमच्या नाकी नऊ आल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या नरेटिव्हचा आम्हाला फटका बसल्याचं मान्य केलं आहे.

उत्तर प्रदेशची निवडणूक फिरली!

भाजप स्वबळावर बहुमत मिळवण्यास अपयशी ठरण्यास उत्तर प्रदेशात झालेली उलथापालथ प्रामुख्याने कारणीभूत ठरली आहे. मागच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात ६२ जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा मात्र केवळ ३३ जागांवर समाधान मानावं लागलं. उत्तर प्रदेशात दलित समाजाची संख्या लक्षणीय आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षापासून दुरावल्यानंतर दलित समाजाने उत्तर प्रदेशात भाजपला साथ दिली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत संविधान वाचवण्याच्या मुद्द्यावर हा समाज इंडिया आघाडीकडे वळल्याचं दिसत आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात विक्रमी ३७ जागा जिंकता आल्या असून काँग्रेसलाही ६ जागांवर यश मिळालं आहे.

दरम्यान, भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी जागा मिळण्यामध्ये ज्या काही गोष्टी कारणीभूत ठरल्या, त्यात भाजपपासून संविधानाला धोका आहे, या विरोधकांच्या प्रचाराची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या 'अब की बार, चारसो पार' या घोषणेनंच भाजपचा घात केला की काय, अशी चर्चा आता रंगत आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश