शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

सरकारपेक्षा वेगळे मत मांडणे म्हणजे देशद्रोह नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले

By देवेश फडके | Updated: March 3, 2021 17:46 IST

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, जम्मू काश्मीरचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. फारूक अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल केलेल्या देशद्रोहाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालायाने (Supreme Court) परखड मत व्यक्त करत केंद्र सरकारला अप्रत्यक्षरित्या फटकारले आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान फारूख अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल देशद्रोहाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

ठळक मुद्देफारूक अब्दुल्ला यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा सरकारपेक्षा वेगळे मत मांडणे देशद्रोह नाही - सुप्रीम कोर्टपुरावा सादर करू न शकल्याने याचिकाकर्त्याला ठोठावला दंड

नवी दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, जम्मू काश्मीरचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. फारूक अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल केलेल्या देशद्रोहाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालायाने (Supreme Court) परखड मत व्यक्त करत केंद्र सरकारला अप्रत्यक्षरित्या फटकारले आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान फारूख अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल देशद्रोहाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (expressing views different from govt is not sedition says sc rejects plea against farooq abdullah)

सरकारच्या मतांपेक्षा भिन्न मत व्यक्त करणे याला देशद्रोह म्हटलं जाऊ शकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर फारूक अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. फारूक अब्दुल्ला यांची खासदारकी रद्द करून भारतीय दंड विधान (IPC) कलम १२४-अ अंतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. 

राहुल गांधींना RSS समजून घ्यायला बराच वेळ लागेल; प्रकाश जावेडकरांचा टोला

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० सन २०१९ मध्ये रद्द करण्यात आले. यानंतर फारूख अब्दुल्ला यांनी भारताविरोधात पाकिस्तान आणि चीनकडून मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात आरोप सिद्ध करणारा कोणताही पुरावा याचिकाकर्ता सादर करू शकला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंड ठोठावला. 

काय म्हटले होते याचिकेत?

फारूख अब्दुल्ला यांच्याविरोधात करण्यात आलेल्या याचिकेत त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा दाखला देण्यात आला होता. कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर फारूख अब्दुल्ला यांनी टीका केली होती. त्याच आधारे सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळून लावली.

फारूक अब्दुल्ला काय म्हणाले होते?

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ अ रद्द केल्यानंतर फारूक अब्दुला यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. केंद्राचा हा निर्णय कदापि मान्य नसल्याचे सांगत यासंदर्भात चीनची मदत घेतली जाऊ शकते. जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा फारूक अब्दुल्ला यांनी दिला होता. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 35 Aकलम 35-एPoliticsराजकारण