शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

मोफत अन्नधान्य योजनेला मुदतवाढ?; हिमाचल प्रदेश, गुजरात निवडणुकांवर डोळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 5:56 AM

सध्या अन्नधान्याचा साठा पुरेसा म्हणजेच ६० दशलक्ष टन आहे; परंतु अनेक राज्यांतील प्रलयंकारी पूर व पंजाब-हरयाणा आदी राज्यांमध्ये पडलेला कमी पाऊस, यामुळे उत्पादन व खरेदीवर परिणाम होऊ शकतो.

हरिश गुप्तानवी दिल्ली : देशातील ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मोदी सरकार तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या योजनेची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास सरकारी तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. आणखी तीन महिन्यांसाठी ही योजना वाढविल्यास ५६४०० कोटी रुपयांचा खर्च वाढणार आहे. या योजनेचा एक वर्षाचा खर्च २,२७,८४१ कोटी रुपये असेल, असे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. 

सध्या अन्नधान्याचा साठा पुरेसा म्हणजेच ६० दशलक्ष टन आहे; परंतु अनेक राज्यांतील प्रलयंकारी पूर व पंजाब-हरयाणा आदी राज्यांमध्ये पडलेला कमी पाऊस, यामुळे उत्पादन व खरेदीवर परिणाम होऊ शकतो. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि भू-राजकीय स्थिती खाली आणण्यासाठी केंद्र सरकारवर आधीच आर्थिक दबाव आलेला आहे. तथापि, हिमाचल प्रदेश (नोव्हेंबर) आणि गुजरात (डिसेंबर) विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच किमान डिसेंबरपर्यंत या योजनेला मुदतवाढ द्यावी, असे भाजप नेतृत्वाला वाटते. ८० कोटी लोकांपर्यंत पोहोचणारी योजना बंद केल्याने दोन राज्यांच्या निवडणुकीत चुकीचा संदेश जाईल, असे नेत्यांचे मत आहे. 

पंतप्रधान घेणार अंतिम निर्णयएससीओ परिषदेवरून परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेबाबत राजकीय दृष्टिकोनातून अंतिम निर्णय घेतील, अशी चर्चा आहे. अन्नधान्य, उर्वरके व स्वयंपाकाच्या गॅसवरील सरकारचे सबसिडी बिल आधीच चिंताजनक स्थितीत वाढले आहे. वित्त मंत्रालयातील व्यय विभाग वाढत्या वित्तीय तुटीमुळे मोफत अन्नधान्य योजनेला मुदतवाढ देण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे सबसिडी बिल कमी करण्यासाठी या योजनेला मुदतवाढ देताना काही अटी घातल्या जातील, अशी शक्यता आहे. प्रत्येक तिमाहीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महसुली वसुलीच्या वाढीमुळे सरकारचे काम आणखी सोपे होऊ शकते.