शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

भारतीय खाद्य उद्योगात व्यापक क्षमता

By admin | Published: March 03, 2017 4:32 AM

भारताची आरोग्यदायी खाद्य परंपरा वैविध्यपूर्ण असून भारतीय खाद्य उत्पादनांत व्यापक आर्थिक क्षमता आहेत,

नवी दिल्ली : भारताची आरोग्यदायी खाद्य परंपरा वैविध्यपूर्ण असून भारतीय खाद्य उत्पादनांत व्यापक आर्थिक क्षमता आहेत, असे प्रतिपादन निति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी केले. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्याची शक्यता असून, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी तयार होतील, असेही कांत म्हणाले. कांत यांनी म्हटले की, भारताच्या किरकोळ आणि खाद्य क्षेत्रात व्यापक क्षमता आहेत. सध्या २५0 अब्ज डॉलरवर असलेला हा उद्योग २0१९-२0पर्यंत ४८२ अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. अमिताभ कांत यांनी पुढे सांगितले की, या क्षेत्राकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचीही व्यापक क्षमता आहे. त्यातून रोजगारांच्या भरपूर संधी निर्माण होतील. अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, येत्या चार ते पाच वर्षांत आम्ही एक कोटीपेक्षा जास्त रोजगार संधी निर्माण करू शकतो. त्यातून खाद्य उद्योगास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल. अर्थव्यवस्थेसाठी ही बाब पोषक ठरेल.कांत म्हणाले की, भारताची प्रशंसा करण्यास भारताच्या खाद्यापेक्षा दुसरा चांगला प्रकार होऊच शकत नाही. जैविक शेतीकडे लक्ष देऊन भारत आपले स्वत:चे ब्रँड मूल्य तयार करू शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)>सिक्किम जैविक राज्य घोषितराजधानी दिल्लीत झालेल्या एका परिसंवादात बोलताना कांत यांनी गेल्या वर्षी सिक्किम सरकारला १00 टक्के जैविक राज्य घोषित केले.त्यांनी यासंदर्भात म्हटले की, माझे असे मत आहे की, भारताने जैविक शेतीकडे अधिक लक्ष दिल्यास भारताचा स्वत:चा ब्रँड तयार होऊ शकतो.अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, येत्या चार ते पाच वर्षांत आम्ही एक कोटीपेक्षा जास्त रोजगार संधी निर्माण करू शकतो.