शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

Falgu River: सीतेच्या शापातून मुक्त होणार फल्गू नदी, पाहा काय होता सीतामाईंचा शाप?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 6:23 AM

Falgu River: पितरांच्या पिंडदानासाठी देश-विदेशात चर्चेमध्ये असलेली फल्गू नदी लवकरच सीतामातेच्या शापातून मुक्त होणार आहे. शापामुळे कोरड्या राहणाऱ्या नदीत वर्षभर दोन ते तीन फूट पाणी वाहणार आहे. बिहार सरकार या दिशेने काम करीत आहे.

- विभाष झा पाटणा : पितरांच्या पिंडदानासाठी देश-विदेशात चर्चेमध्ये असलेली फल्गू नदी लवकरच सीतामातेच्या शापातून मुक्त होणार आहे. शापामुळे कोरड्या राहणाऱ्या नदीत वर्षभर दोन ते तीन फूट पाणी वाहणार आहे. बिहार सरकार या दिशेने काम करीत आहे.

कोरड्या फल्गू नदीमध्ये पाणी राहावे, यासाठी रबर डॅमचे निर्माणकार्य वेगाने करण्यात येत आहे. मोकामाहून पाईपलाईनद्वारे गंगा नदीचे पाणी गयेपर्यंत नेण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. रबर डॅम लवकरच तयार होईल, असे सांगितले जात आहे. त्यानंतर गंगा नदीच्या पाण्याने फल्गू नदी खळखळू शकते. यामुळे फल्गू नदीत वर्षभर पाणी राहून येथे पिंडदानासाठी येणाऱ्या भाविकांनाही दिलासा मिळेल.

सध्या फल्गू नदीमध्ये पाणी नसल्यामुळे पिंडदानाला येणाऱ्या भाविकांना नदीच्या वाळूमध्ये दीड ते दोन फूट खोदकाम केल्यावरच पाणी मिळते. लोक येथे खोदकाम करून पाण्याने तर्पण करतात. गयाचे जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन एसएम यांनी सांगितले की, फल्गू नदीवर रबर डॅम उभारण्याचे काम वेगाने केले जात आहे. 

काय होता शाप? पौराणिक कथेनुसार, राजा दशरथाचे पिंडदान फल्गू नदीच्या तीरावर सीता मातेने वटवृक्ष, गाय, तुळस, फल्गू नदी व ब्राह्मण यांना साक्षी मानून केले होते. त्यावेळी भगवान राम व लक्ष्मण पिंडदानाचे साहित्य आणण्यासाठी गेले होते. ते परतल्यावर सीतामातेने त्यांना पिंडदानाबाबत सांगितले. त्यानंतर सीतेने ज्यांना साक्षी मानले होते, त्या सर्वांना बोलावले. परंतु वटवृक्ष सोडून कोणीही खरे सांगितले नाही. यामुळे नाराज झालेल्या सीतामातेने इतरांना शाप दिला व वटवृक्षाला वरदान देऊन सांगितले की, कुणाचेही पिंडदान तुझ्या पूजनाशिवाय पूर्ण होणार नाही.

टॅग्स :riverनदीBiharबिहार