शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
3
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
4
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
5
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
6
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
7
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
8
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
9
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
10
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
11
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
12
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
13
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
14
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
15
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
16
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
17
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
18
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
19
"पहिल्या सीझनला मला स्पर्धक म्हणून ऑफर होती", केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, 'शो स्क्रीप्टेड...'
20
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

पाकिस्तानात जितके दहशतवादी नाहीत, तेवढे आपल्याकडे देशद्रोही आहेत - तरुण सागर

By admin | Published: June 30, 2017 1:50 PM

पाकिस्तानमध्ये जितके दहशतवादी नाहीत, त्याहून जास्त देशद्रोही आपल्या देशात आहेत असं तरुण सागर यांनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत
सीकर (राजस्थान), दि. 30 - आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे प्रवचनकार जैन मुनी तरुण सागर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानमध्ये जितके दहशतवादी नाहीत, त्याहून जास्त देशद्रोही आपल्या देशात आहेत असं तरुण सागर यांनी केलं आहे. प्रवचनकार जैन मुनी तरुण सागर यांनी राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात पिपराली येथे वैदिक आश्रमात पत्रकारांशी बातचीत करताना हे वक्तव्य केलं आहे.
 
तरुण सागर बोलले आहेत की, "देशात राहतात, देशाचं खातात आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात, मग अशी लोक देशद्रोही नाहीत तर मग कोण आहेत". जम्मू काश्मीरमध्ये वारंवार जवानांवर होणा-या दगडफेकीवर भाष्य करताना तरुण सागर यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
(जैन साधू तरुण सागर यांची ददलानी यांनी मागितली माफी)
 
यावेळी तरुण सागर यांनी दहशतवादी हल्ल्यांवरही भाष्य केलं आहे. "दहशतवादी वाघाप्रमाणे समोरुन वार करत नाही, ते तर लांडग्याप्रमाणे मागून हल्ला करतात", असं तरुण सागर बोलले आहेत. 
 
यावेळी तरुण सागर यांनी देशातील गरिबीवरही भाष्य केलं. "लोक म्हणतात भारत गरीब देश आहे, पण भारत गरीब देश नाही. मला वाटतं देशात गरीबी नाही तर असामनता आहे", असं स्पष्ट मत तरुण सागर यांनी व्यक्त केलं आहे. 
 
आपल्या बेधडक वक्तव्यं आणि प्रवचनांवरही यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तरुण सागर यांनी सांगितलं की, "कडूपणा माझ्या प्रवचनांमध्ये नाही, तर समाज आणि लोकांच्या आपापसताली संबंधांमध्ये आहे. यामुळे माझी प्रवचने बेधडक वाटू शकतात".
 
याआधी एकदा संगीतकार विशाल ददलानी याने तरुण सागर यांच्याबद्दल वादग्रस्त टि्वट केलं होतं ज्यासाठी त्याला माफी मागावी लागली होती. ददलानी यांनी तरुण सागर महाराजांबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते व त्यामुळे वाद उफाळला होता.
 
ददलानी तरुण सागर महाराजांच्या येथील आश्रमात गेले णि ‘पंच माफी’ या जैन समाजाच्या परंपरेप्रमाणे क्षमा मागितली. ददलानी यांच्या क्षमायाचनेनंतर जैन साधू त्यांना म्हणाले होते की, मी तुम्हाला आधीच माफ केले आहे. तुम्ही जैन समाजाची क्षमा मागावी तसेच ट्विटरवरील ट्विट डीलीट करून हा विषय संपल्याचे जाहीर करावे. तरुण सागर महाराजांनी गेल्या महिन्यात हरियाणा विधानसभेत भाषण केले होते. त्यानंतर ददलानी यांनी त्यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याने वाद उफाळला होता.