शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

राज्यसभेतील 72 सदस्यांना निरोप, राऊतांसह महाराष्ट्रातील 8 जणांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 07:13 IST

सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसदीय पद्धती मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

नवी दिल्ली : एरवी एकमेकांवर आरोप करणाऱ्या विविध पक्षांच्या सदस्यांनी राजकीय मतभेद विसरून संसदीय परंपरा अधिक दृढ करण्यासाठी सत्तारूढ व विरोधकांच्या योगदानाच्या भूमिकेचे समर्थन केले. गुरुवारी राज्यसभेचे कोणतेही इतर कामकाज न होता सदस्यांना निरोप देण्यात आला. येत्या तीन महिन्यांत राज्यसभेतून ७२ सदस्य निवृत्त होत आहे. यात महाराष्ट्रातील आठ सदस्यांचा समावेश आहे.

सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसदीय पद्धती मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भाषण करताना ते एकदा भावुकही झाले होते. सर्वच पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांबद्दल प्रेम, आदर व सद्भावना व्यक्त केली. संसदीय पद्धती मजबूत करण्यासाठी सत्तारूढ व विरोधी पक्षांच्या भूमिकेचे महत्त्वही अधोरेखित केले.  यावेळी भाषण करताना मावळते सदस्य डॉ. विकास महात्मे यांनी राजकारण आपण लोकनीतीसारखे केल्याचा उल्लेख केला. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी संसदीय कामकाजात सुधारण्याच्या सूचना केल्या. 

छत्रपती संभाजी व डॉ. सहस्रबुद्धेंचा गौरवसभापती एम. वेंकय्या नायडू यांनी छत्रपती संभाजीराजे व डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या सखोल व अभ्यासपूर्ण योगदानाचा विशेष उल्लेख केला.

महाराष्ट्रातील सदस्यकेंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, डॉ. विनय सहस्रबुद्धे, डॉ. विकास महात्मे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, शिवसेनेचे नेते संजय राऊत तसेच राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित झालेले छत्रपती संभाजीराजे व डॉ. नरेंद्र जाधवसुद्धा निवृत्त होत आहेत. यावेळी बोलताना सभागृहाचे नेते पीयूष गोयल यांनी विरोधकांच्या भूमिकेचेही समर्थन केले.

ज्ञानापेक्षाही अनुभवी सदस्यांचे योगदान महत्त्वाचे -मोदी‘राज्यसभेत असलेल्या अनेक सदस्यांकडे संसदीय कामाचा मोठा अनुभव आहे. अनेकदा ज्ञानापेक्षा व्यक्तीचा अनुभव समाजाचे जीवन समृद्ध करण्यात मोठी भूमिका बजावतात. संसदीय प्रणाली शाबूत राखण्यात या अनुभवाचे निश्चित मोठे योगदान आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केले.  राज्यसभेतून एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ७२ सदस्य निवृत्त होत आहेत. या सर्व सदस्यांना राज्यसभेत निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘ज्ञानाचे महत्त्व मर्यादित आहे. ते चर्चासत्रात कामी येते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतRajya Sabhaराज्यसभाMember of parliamentखासदार