शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

MSP गॅरंटी, भरपाई, पेन्शन, स्वामीनाथन रिपोर्ट...शेतकरी संघटनांच्या सरकारला 12 मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:43 IST

Farmer Protest : शंभू सीमेवर (पंजाब-हरियाणा बॉर्डर) आंदोलन करणारे शेतकरी पुन्हा दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत.

Farmer Protest : आठ महिन्यांपासून शंभू सीमेवर (पंजाब-हरियाणा बॉर्डर) आंदोलन करणारे शेतकरी आजपासून पुन्हा दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. यावेळी शेतकरी त्यांच्या दिल्ली चलो आंदोलनात ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन नाही, तर पायी निघाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा आणि दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. जाहीर सभा आणि मिरवणुकांवर बंदी घातली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. ड्रोन आणि वॉटर कॅननचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 

पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, एकाला ताब्यात शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला अन् बॅरिकेडचा एक थर काढून पुढे जाऊ लागला. यावेळी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून एका शेतकऱ्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर म्हणाले की, हरियाणा पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर पायी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटाला परत बोलावले आहे. तासाभरानंतर शेतकरी संघटना बैठक घेतील आणि पायी मोर्चाची भावी रणनीती ठरवण्यासाठी पत्रकार परिषद बोलावतील.

दरम्यान, आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सरकारपुढे 12 मागण्या ठेवल्या आहेत. या 12 मागण्यांसाठी हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढत आहेत. यामध्ये एमएसपी हमी, भरपाई आणि पेन्शनपासून ते स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाच्या सूचना लागू करण्यापर्यंतच्या मागण्यांचा समावेश आहे. पाहा 12 मागण्या...

शेतकऱ्यांच्या 12 मागण्या 

1) सर्व पिकांच्या खरेदीवर एमएसपी हमी कायदा करावा. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या सूचनेनुसार सर्व पिकांचे भाव C2+50% या सूत्रानुसार निश्चित करावेत.

2) उसाची एफआरपी आणि एसएपी स्वामिनाथन आयोगाच्या सूत्रानुसार द्यावी. हळदीसह सर्व मसाल्यांच्या खरेदीसाठी राष्ट्रीय प्राधिकरण बनवा.

3) शेतकरी व मजुरांना संपूर्ण कर्जमाफी.

4) गेल्या दिल्ली आंदोलनातील अपूर्ण मागण्या...

> लखीमपूर खेरी हत्याकांडात न्याय मिळावा. सर्व आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

> मागील आंदोलनाच्या करारानुसार जखमींना 10 लाख रुपयांची भरपाई द्यावी.

> दिल्ली मोर्चासह देशभरातील सर्व आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले खटले रद्द करावेत.

> आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकरी आणि मजुरांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि नोकऱ्या द्याव्यात.

> दिल्लीतील किसान मोर्चाच्या हुतात्मा स्मारकासाठी (सिंगू बॉर्डर) जागा द्यावी.

> वीज क्षेत्राचे खासगीकरण करण्यासाठी वीज दुरुस्ती विधेयकावर दिल्ली किसान मोर्चादरम्यान एकमत झाले होते. ग्राहकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्याची अंमलबजावणी होणार नाही, जी सध्या मागच्या दाराने अध्यादेशाद्वारे लागू केली जात आहे.

> कृषी क्षेत्राला प्रदूषण कायद्यापासून दूर ठेवावे.

5) भारताने WTO मधून बाहेर पडावे. कृषी माल, दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाजीपाला आणि मांस इत्यादींवरील आयात शुल्क कमी करण्यासाठी भत्ता वाढवला पाहिजे. भारतीय शेतकऱ्यांच्या पिकांची प्राधान्याने खरेदी करावी.

6) 58 वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन योजना लागू करावी.

7) पंतप्रधान पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी सरकारने स्वतः विम्याचा हप्ता भरावा, सर्व पिकांना योजनेचा भाग बनवा, नुकसानीचे मूल्यांकन करताना शेततळ्याचा एकराचा विचार करून नुकसानीचा विचार करावा.

8) भूसंपादन कायदा 2013 ची त्याच पद्धतीने अंमलबजावणी करावी. भूसंपादनाबाबत केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या सूचना रद्द कराव्यात.

9) मनरेगा अंतर्गत दरवर्षी 200 दिवस रोजगार मिळावा, मजुरी 700 रुपये प्रतिदिन करण्यात यावी. यामध्ये शेतीचा समावेश करावा.

10) कीटकनाशके, बियाणे आणि खते कायद्यात सुधारणा करून कापसासह सर्व पिकांच्या बियाणांचा दर्जा सुधारला पाहिजे. बनावट आणि निकृष्ट उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे.

11) संविधानाच्या पाचव्या अनुसूचीची अंमलबजावणी.

12) कामगारांचे किमान वेतन दरमहा 26 हजार रुपये करण्याची मागणी.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली