शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

शेतकरी मोर्चात तणाव; ७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; ‘दिल्ली चलो’ मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 6:45 AM

आंदोलक २९ फेब्रुवारीपर्यंत शंभू व खनौरी सीमेवर थांबतील, असे शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांनी दिली. 

चंडीगड : किमान हमीभावाचा कायदा करण्यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनातील संघर्षामुळे तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हरयाणाच्या अंबाला, कुरूक्षेत्र, कैथल, जींद, हिसार, फतेहाबाद, सिरसा या ७ जिल्ह्यांत लावण्यात आलेली मोबाइल इंटरनेट व सामूहिक एसएमएस (संदेश) सेवेवरील बंदी शनिवारी रात्री ११:५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली.

संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा या संघटनांच्या नेतृत्वातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणा सरकारकडून सर्वप्रथम ११ फेब्रुवारी रोजी इंटरनेट व सामूहिक एसएमएसवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर १३, १५, १७, १९, २० आणि २१ फेब्रुवारी रोजी बंदीला मुदतवाढ देण्यात आली होती. शनिवारी आंदोलनाचा १२ दिवस होता. परिस्थिती अजूनही गंभीर आणि तणावपूर्ण असल्यामुळे इंटरनेट व सामूहिक एसएमएसवरील बंदी वाढविण्यात येत आहे. व्हॉईस कॉल सेवा मात्र सुरू राहील, असे अतिरिक्त मुख्य सचिव टी .व्ही. एस .एन.प्रसाद यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

चकमकीनंतर मोर्चाला ५ दिवसांचा ब्रेकखनौरी येथे पोलिस आणि आंदोलकांत चकमक झाल्यानंतर बुधवारी शेतकऱ्यांची दिल्ली कूच २ दिवसांसाठी स्थगित केली होती. आंदोलक २९ फेब्रुवारीपर्यंत शंभू व खनौरी सीमेवर थांबतील, असे शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांनी दिली. 

तोपर्यंत अंत्यसंस्कार नाहीत...खनौरी येथे ठार झालेला शेतकरी शुभकरण सिंह याच्या मृत्यूप्रकरणी पंजाब पोलिसांनी गुन्हा नोंदवावा; अन्यथा तोपर्यंत शुभकरणच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा शेतकरी नेते  जगजीत सिंह डल्लेवाल यांनी दिला. 

जखमी शेतकऱ्यांना आमच्याकडे सोपवा; पंजाब पोलिसांची मागणीदरम्यान, पंजाबचे मुख्य सचिव अनुराग वर्मा यांनी शनिवारी हरयाणाच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहून जखमी शेतकऱ्यांना मोफत उपचारासाठी पंजाब सरकारच्या स्वाधीन करण्याची मागणी केली.रोहतकमध्ये उपचार घेत असलेले प्रीतपालसिंह आणि इतर शेतकऱ्यांना आपल्याकडे सोपविण्याची मागणी वर्मा यांनी केली आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन