शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

शेतकरी आंदोलनाला लवकरच पूर्णविराम मिळेल- नरेंद्र सिंह तोमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 07:13 IST

शेतकऱ्यांकडून येणाऱ्या प्रस्तावाची आम्ही वाट पाहत आहोत

- विकास झाडेनवी दिल्ली : आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा आम्ही सन्मान करतो. परंतु तोडगा काढायचा असेल, तर तो सीमेवर निघणार नाही, टेबलवरच निघू शकतो. आम्ही शेतकऱ्यांकडून येणाऱ्या प्रस्तावाची वाट पाहत आहोत, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.भाजपचे थिंक टॅंक खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी मोजक्या पत्रकारांसमोर नरेंद्र सिंग तोमर यांनी कृषी कायदे आणि आंदोलनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. तोमर म्हणाले, मोदी सरकारची भूमिका सतत शेतकऱ्यांच्या कल्याणाची आणि न्याय देण्याची आहे. शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत आम्ही ११ बैठका घेतल्या. तासन‌्तास चाललेल्या या बैठकांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचीच चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता, शेवटच्या बैठकीमध्ये आम्ही तिन्ही कृषी कायदे दीड वर्षे स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही. आता आम्ही शेतकऱ्यांकडून नव्या प्रस्तावाची वाट पाहात आहोत. मनात कोणताही संभ्रम न ठेवता त्यांच्याकडून मनमोकळी चर्चा अपेक्षित आहे. कायद्याचे अध्ययन व्हावेशेतकऱ्यांनी कायद्यातील कोणतेही आक्षेप ठोसपणे मांडले नाहीत. त्यांनी आधी कायद्याचे अध्ययन करावे त्यानंतर त्यांनाच हा कायदा शेतकऱ्यांच्या किती हिताचा आहे, ते पटेल. कायदा पारित झाला, तेव्हा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कायद्याचे स्वागत केले होते, याकडेही तोमर यांनी लक्ष वेधले.‘एमएसपी‘ कायदा कसा शक्य आहे?तोमर म्हणाले, एमएसपीचा कायदा कसा शक्य आहे? याचा भुर्दंड सामान्यांवर बसेल. परंतु एमएसपी आधीप्रमाणेच सुरू आहे. त्याला जराही छेडले जाणार नाही. शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविण्यात आला आहे. काँग्रेसकडून दिशाभूलकेवळ राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. परंतु ही बाब फार काळ टिकणार नाही. शेतकऱ्यांनाही सत्य काय आहे ते उलगडेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर