शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

शेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात केंद्रानं पाठवले 1100 निमलष्करी दलाचे जवान

By admin | Published: June 08, 2017 9:07 AM

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यात उफाळून आलेला हिंसाचार रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यात उफाळून आलेला हिंसाचार रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत, मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत चाललं आहे.  मंगळवारी (6 जून) पोलिसांच्या गोळीबारात 5 आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन हिंसक झाले आहे. शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटद्वारे शेतक-यांना शांतता राखण्याचं आवाहन केले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मध्य प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली होती. 
 
केंद्र सरकारने मध्य प्रदेशातील मंदसौरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी दलाचे जवळपास 1100 जवान पाठवण्यात आले आहेत.  तसंच केंद्र सरकारनं बुधवारी राज्य सरकारकडून मध्य प्रदेशातील परिस्थितीबाबत अहवालही मागवला आहे. दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी (7 जून) पोलिसांच्या गोळीबारात मृत पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मंदसौर येथे रवाना झाले आहेत. 
 
मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराबाबत बोलताना राहुल म्हणाले की, हे सरकार आमच्या देशातील शेतकऱ्यांशी युद्ध करीत आहे. भाजपाच्या नव्या भारतात आपल्या हक्काची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या बदल्यात गोळ्या मिळत आहेत, असे ट्विट राहुल यांनी केलं होतं. 
 
बुधवारी येथील परिस्थिती अधिक गंभीर झाली कारण शेतक-यांच्या आंदोलनाचे लोण राज्यातील अन्य भागांमध्येही पसरले. 
बुधवारी शेतक-यांनी देवासमधील पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला आणि तेथील वाहनं पेटवून दिली. तर भोपाळ-इंदुरदरम्यान दोन बससहीत जवळपास 10 हून अधिक वाहनांनादेखील शेतक-यांनी आग लावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतक-यांनी पिपलिया पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला, जेथे त्यांनी उग्र स्वरुपात आपला संताप व्यक्त करीत तेथील वाहनांना आगल लावली. यानंतर आंदोलनकर्ते शेतकरी नेवली फाटाकडे वळले, व तेथेही मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली.
 
दरम्यान, केंद्रीय मंत्री व्यकंय्या नायडू यांनी शेतक-यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पार्टीला जबाबदार धरले. मध्य प्रदेशातील मंदसौरमधील शेतक-यांच्या आंदोलनाच्या नावावर काँग्रेस पार्टी हिंसाचार घडवत असल्याचा आरोप नायडू यांनी बुधवारी केला.
काँग्रेस या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. मला फक्त त्यांना हेच सांगायचे आहे की त्यांनी यांचं राजकारण करू नये आणि शेतकरी आंदोलनाच्या नावावर हिंसा भडकवू नये, कारण याचे परिणाम त्यांच्यावर उलटू शकतात, असाही इशारा नायडू यांनी दिला.
 
दरम्यान, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदक करण्याची घोषणा केली. ट्विटर आर्थिक मदतीची घोषणा करताना अखिलेश यांनी भाजपावर निशाणादेखील साधला. ""उत्तर प्रदेशात कर्जमाफीच्या नावाखाली विश्वासघात, महाराष्ट्रातील शेतकरी संपावर. मध्य प्रदेश (मंदसौर)मध्ये गोळीबार करुन 5 शेतक-यांची हत्या"", असे ट्विट करत अखिलेश यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 
 
दरम्यान, गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे.