शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

Kisan Kranti Padyatra: 'राजा'विरोधात बळीराजाचा एल्गार, दिल्लीच्या वेशीवर पोलीस-शेतकरी भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 11:37 IST

कर्जमाफी, उसाला योग्य भाव यासह  दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडक दिली आहे.

नवी दिल्ली - कर्जमाफी, उसाला योग्य भाव यासह  दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडक दिली आहे. दरम्यान, या शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. तसेच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा आणि पाण्य़ाच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. तसेच दिल्लीच्या पूर्व भागामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

 

दरम्यान, जर दिल्लीतील सरकारला आमच्या समस्या ऐकवायच्या नाहीत, तर मग कुणाला ऐकवायच्या. आमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये जायचं का? असा सवाल शेतकरी नेत्यांनी केला आहे. 

भारतीय किसान युनियनच्या झेंड्याखाली किसान क्रांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा आज सकाळी राजधानी नवी दिल्लीच्या उंबरठ्यावर पोहोचली. मात्र या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला असून, राजधानीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे सीमेवरील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांच्या मागण्या - 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन द्यावे- पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल करण्यात यावा- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर देय रक्कम द्यावी- शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी- सिंचनासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा- किसान क्रेडिट कार्डवर व्याजमुक्त कर्ज मिळावे- भटक्या जनावरांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी व्यवस्था करावी- सर्व पिकांची पूर्णपणे खरेदी व्हावी- स्वामिनाथन समितीचा अहवाल स्वीकारण्यात यावा- उसाची देय रक्कम मिळण्यास उशीर झाल्यास त्यावर व्याज मिळावे 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकारNew Delhiनवी दिल्ली