शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

देशभरातील शेतकरी नेते ‘बुढा’ गावात

By admin | Published: July 05, 2017 8:22 PM

शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती आणि उत्पादन खर्चावर दीडपट दाम मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे उद्या ६ जुलै

- रमाकांत पाटील/ ऑनलाइन लोकमत

बुढा (मध्यप्रदेश), दि. 05 -  शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती आणि उत्पादन खर्चावर दीडपट दाम मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे उद्या ६ जुलै पासून मध्यप्रदेशातील मंदसौर ते दिल्ली अशी किसान मुक्ती यात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील शेतकरी नेते बुढा गावात एकत्र झाले आहे. गेल्या महिनाभरापासून देशभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विविध ठिकाणी संतापाचे वातावरण आहे. विशेषत: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संप आणि मध्यप्रदेशातील पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेला गोळीबार या पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकरी संघटनांनी एकत्र येवून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना केली आहे. या समितीतर्फे ६ ते १८ जुलै या दरम्यान मंदसौर ते दिल्ली किसान मुक्ती यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी पूर्वसंध्येला या सर्व शेतकरी संघटनांचे नेते बुढा या गावात मुक्कामी आले आहे. यात महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे मुख्य संयोजक व्ही.एम.सिंग, आॅल इंडिया किसान सभेचे हन्नान मौला, जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक माजी आमदार सुनिलम्, जय किसान आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव यांच्यासह विविध संघटनांचा नेत्यांचा समावेश आहे.- या यात्रेच्या पूर्वसंध्येलाच मध्यप्रदेशातील मुख्य शेतकरी नेते सुनिलम् यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.श्रद्धांजली सभेला परवानगी नाकारली...- गेल्या महिन्यात मंदसौर येथे शेतकरी आंदोलनावर मध्यप्रदेश पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर किसान मुक्ती यात्रेची सुुरुवात मंदसौरपासून होत आहे. सुरुवातीला बही चौपाटीवर ६ जुलैला सकाळी ११ वाजता श्रद्धांजली सभा होणार होती. त्यास मध्यप्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली असून सर्वत्र चोख बंदोबस्त आहे. दरम्यान सरकारचा विरोध असला तरी श्रद्धांजली सभा होणारच असा निर्धार शेतकरी नेत्यांनी घेतला आहे.