शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

'शेतकऱ्यांनी राजाला झुकायला भाग पाडले'; कृषी कायद्यांच्या निर्णयावर प्रकाश राज यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 15:44 IST

प्रकाश राज यांनी ट्विटरवर त्यांनी वाचलेल्या एका कवितेचा व्हिडिओही पोस्ट केला आहे.

नवी दिल्ली: अभिनेते प्रकाश राज हे सोशल मीडियावर आपले मत मुक्तपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकवेळा विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले आहे. प्रकार राज भाजपचे टीकाकार आहेत, त्यामुळे त्यांनी अनेकदा भाजपविरोधात वक्तव्यं केलेली पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा त्यांनी सरकार आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदा मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयानंतर मागील एका वर्षापेक्षा जास्त काळापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या निर्णयावर विविध क्षेत्रातील लोक आपले मत मांडत आहेत. याच निर्णयावर प्रकाश राज यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवरुन त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये प्रकाश राज यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षाचे कौतुक केले आहे. 'माझ्या देशातील संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी राजाला झुकायला भाग पाडले. मी अनिता नायर यांची एक कविता वाचली होती, जी कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने होती..' अशाप्रकारचे ट्वीट प्रकाश राज यांनी केले आहे. यासोबतच शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वतः वाचलेल्या कवितेचा व्हिडिओही शेअर केला आहे. त्यांच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

नरेंद्र मोदी काय म्हणाले ?आज सकाळी नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी कायदे परत घेत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, ''शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे'', असं मोदींनी जाहीर केलं.

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजNarendra Modiनरेंद्र मोदी