शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ! राहुल गांधी म्हणाले, "जे बोललो, ते करून दाखवलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 16:44 IST

तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांवरील 31,000 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांवरील 31,000 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यानंतर सरकार १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल, असे खुद्द मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले. यातच, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शनिवारी तेलंगणातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

ट्विट करत राहुल गांधी म्हणाले, ‘तेलंगणातील शेतरी कुटुंबांना शुभेच्छा. काँग्रेस सरकारने आपले 2 लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ करून शेतकरी न्यायाचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. यामुळे 40 लाखहून अधिक शेतकरी कुटुंब कर्ज मुक्त होतील. जे बोललो, करून दाखवलं, हीच नियत आहे आणि सवयही.’

47 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा - राहुल गांधी म्हणाले, "काँग्रेस सरकारचा अर्थ, राज्याच्या तिजोरीतील पैसा शेतकरी, मजूर आणि वंचित समाजाला मजबूत करण्यासाठी खर्च होईल, याची हमी. तेलंगणा सरकारचा हा निर्णय त्याचे उदाहरण आहे. आमचे आश्वासन आहे की, जिथे जिथे काँग्रेसचे सरकार असेल तिथे-तिथे भारताचा पैसा भारतीयांवर खर्च करेल, भांडवलदारांवर नाही."

तेलंगणा सरकारच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील जवळपास 47 लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांची रूपरेषा लवकरच अधिसूचित केली जाईल. विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने तेलंगणातील जनतेला आश्वासन दिले होते की, राज्यात आपले सरकार आल्यास आपण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. काँग्रेसला या आश्वासनाचा मोठा फायदा झाल्याचेही बोलले जाते. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही कर्जमाफी योजना १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री तथा राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTelanganaतेलंगणाcongressकाँग्रेसFarmerशेतकरी