शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

शेतकऱ्यांना अनुदान, पीक विमा संरक्षण हवे

By admin | Published: February 27, 2016 1:57 AM

देशातील वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सिंचनाची क्षमता वाढविण्याबरोबरच पीक विम्याचे संरक्षण देण्यासारखे उपाय पुरेसे नसून शेतकऱ्यांना कर्जमाफी व पुरेसे अनुदान देणे

नवी दिल्ली : देशातील वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सिंचनाची क्षमता वाढविण्याबरोबरच पीक विम्याचे संरक्षण देण्यासारखे उपाय पुरेसे नसून शेतकऱ्यांना कर्जमाफी व पुरेसे अनुदान देणे गरजेचे असल्याचे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. देशातील बहुसंख्य भागात यंदा दुष्काळी स्थिती असून त्यामुळे भात, कापूस व इतर पिकांना फटका बसला आहे. त्यातच शेतीमालाला पुरेसे भाव नसल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. देशातील निम्म्यापेक्षा अधिक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली असून यापूर्वीच्या सरकारांनी कर्जमाफी दिल्यानंतरही त्याच्यावरील आर्थिक संकटे कमी झालेली नाहीत. त्यामुळे गेल्या दशकात नापिकी व कर्जबाजारीपणामुळे लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्येचा टोकाचा मार्ग निवडल्याचे कृषी क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थसंकल्पात विकासदराचे लक्ष्य गाठताना अडचणीतील शेतकरी आणि दुर्बल घटकांना त्याचे फायदे करून देण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. शेतकऱ्यांना वाचवण्याचे मोठे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)देशात २०१४ मध्ये ५,६५० शेतकरी आत्महत्यांची सरकारी दरबारी नोंद झाली. त्यातील अर्ध्याहून अधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या. मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड व कर्नाटकातही मोठ्या संख्येने आत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांच्या मागण्याहवामानाचा अचूक अंदाज वर्तवावा खतांवरील अनुदान वाढवावेसर्व पिकांना राज्य सरकार पुरस्कृत विमा योजना लागू करावीदाव्यांचा निपटारा लवकर व्हावाकेंद्र सरकारने गेल्या महिन्यात पिकांच्या नुकसानीवरील भरपाईसाठी महत्त्वाकांक्षी विमा योजना जाहीर केली आहे. त्यात शेतकऱ्यांना अत्यल्प हप्ता भरावा लागेल, असे सरकारने आश्वासन दिले आहे.विम्याचे दावे लवकर निकाली निघण्यासाठी सरकारला प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल, असे ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायरोन्मेंट’च्या संचालक सुनिता नारायण यांनी सांगितले.