शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णय, आता संसद भवनापर्यंत शेतकरी मोर्चा काढणार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 20:06 IST

farmers will march till parliament house in first week of may : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या तीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असेलल्या शेतकरी संघटनांनी मोठी घोषणा केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. या मोर्चाचा दिवस व तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. (farmers will march till parliament house in first week of may)

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सिंघु, टिकरी आणि गाजीपूरच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी संघटनांनी आज बैठक घेऊन असा निर्णय घेतला की, शेतकरी आपल्या मागण्या घेऊन संसदेच्या दिशेने वाटचाल करतील. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढतील.

("शेतकरी संघटनांनी ठरवलं तर आंदोलन लवकर संपू शकतं, केंद्र सरकार पुन्हा चर्चेसाठी तयार")

नव्या कृषी कायद्यांबाबत तोडगा काढण्यासाठी 1 डिसेंबर 2020 पासून सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या. एकामागून एक, सरकार आणि सुमारे 40 शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये 11 फेऱ्या झाल्या. मात्र, या सर्व बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांर ठाम आहेत. 

दरम्यान, गेल्या शनिवारी (27 मार्च) पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजपा (BJP) आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग (Arun Narang) यांना बेदम मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. 

( संतप्त शेतकऱ्यांकडून भाजपा आमदाराला बेदम मारहाण; कपडे फाडले, शाई फेकली अन् तोंडाला फासलं काळं)

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार अरुण नारंग राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. मात्र ते येण्याच्या आधीपासूनच संतप्त शेतकरी भाजपा कार्यालयात त्यांची वाट पाहत होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती गर्दी केली आणि त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या कारलाही काळं फासलं आहे. अखेर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत आमदार अरुण नारंग यांना शेतकऱ्यांच्या गर्दीतून बाहेर काढले. अरुण नारंग पंजाबमधील अबोहरमधून भाजपा आमदार आहेत.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीFarmerशेतकरी