शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सरकारचा कायदा स्थगितीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला, गणतंत्रदिनी रिंग रोडवर ट्रॅक्टर रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 06:54 IST

शेतकरी नेते दर्शन पाल यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सरकारचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. तीनही कृषी कायदे पूर्णपणे रद्द करणे आणि सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देण्यासाठी एक कायदा बनविणे या आंदोलनातील मुख्य मागण्या आहेत.

विकास झाडे -नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांची अंमलबजावणी दीड वर्षासाठी स्थगित करणे आणि तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करणे हा केंद्र सरकारचा प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. शेतकरी नेते दर्शन पाल यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सरकारचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. तीनही कृषी कायदे पूर्णपणे रद्द करणे आणि सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देण्यासाठी एक कायदा बनविणे या आंदोलनातील मुख्य मागण्या आहेत. आतापर्यंत १४७ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. गणतंत्र दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचे निश्चित केले आहे. आज दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना रॅली काढू नका म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात यश आले नाही. ही रॅली दिल्लीच्या रिंंग रोेडवर काढली जाणार आहे. दि. २३ रोजी देशभरात राजभवनाला घेराव घालण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र, हा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे. आंदोलनात केली शेतकऱ्याने आत्महत्या -टिकरी सीमेवर शेतकरी जय भगवान (४२) यांनी आंदोलनादरम्यान विष घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयात नेण्यात येत असताना भगवान यांचा मृत्यू झाला. विष खायच्या आधी त्यांनी देशवासियांच्या नावाने पत्र लिहिले. रोहटक जिल्ह्यातील पाकस्मा गावातील शेतकरी जय भगवान दोन-तीन दिवसांपूर्वी आंदोलनात सहभागी व्हायला दिल्लीत आले होते. तेथे त्यांनी कृषी कायदे रद्द न होणे , शेतकरी आणि सरकार दोघेही आपल्या भूमिकांवर अडून बसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले.

सरकारवर विश्वास ठेवायचा कसा?एका शेतकरी नेत्याने दिलेल्या माहितीनुसार बहुतांश शेतकरी नेते ही सरकारच्चा प्रस्ताव फसवा असून या प्रस्तावाला विरोध करायचा या मताचे आहेत. तर काहींना वाटते सरकारचा प्रस्ताव मान्य करायचा आणि सरकारने तयार केलेल्या समितीच्या माध्यमातून हे कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न करायचे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्ली