शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कमी नुकसानभरपाईमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Published: March 31, 2016 3:26 AM

नैसर्गिक संकटाचा मार झेलत असताना मिळालेल्या कमी नुकसानभरपाईमुळेच काही शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग अवलंबावा लागला, हे वास्तव असून त्याबाबत चूक दुरुस्त करण्याची

नवी दिल्ली : नैसर्गिक संकटाचा मार झेलत असताना मिळालेल्या कमी नुकसानभरपाईमुळेच काही शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग अवलंबावा लागला, हे वास्तव असून त्याबाबत चूक दुरुस्त करण्याची गरज आहे, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला धारेवर धरले.आम्ही कोणत्याही सरकारविरुद्ध नाही. चांगले काम करीत असल्याचा दावा सरकार नेहमीच करीत आले आहे, मात्र शेतकरी आत्महत्या करीत आहेत, हे सर्वज्ञात आहे, असे एम.बी. लोकूर, एन.व्ही. रामण या न्यायमूर्तीद्वयांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. नैसर्गिक संकटाची झळ पोहोचलेल्या भागासाठी आर्थिक मदतीसंबंधी मार्गदर्शक तत्त्वांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे सुचविणाऱ्या जनहित याचिकेवर खंडपीठाने सुनावणी केली. पिकांच्या नुकसानीबाबत आढावा घेताना मनमानी पद्धत अवलंबली जात नसल्याचा दावा करतानाच अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी संबंधित आरोप फेटाळले. पिकांच्या नुकसानीचा आढावा घेताना पटवारी आणि अन्य अधिकारी मनमानी पद्धत अवलंबत असल्याचा आरोप स्वराज अभियान या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)निवडणूक विश्लेषक आणि कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी आर्थिक मदतीबाबत केल्या जात असलेल्या भेदभावाकडे लक्ष वेधले.शेताला शेत लागून असलेल्या दोन भावांपैकी एकाला १६ हजार तर दुसऱ्याला केवळ १६० रुपये नुकसानभरपाई मिळाल्याचा दावा यादव यांनी केला. मोदी सरकारने अलीकडेच घोषणा केलेली ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ अशा परिस्थितीत सुसंगत ठरते काय? दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल काय, असा प्रश्नही खंडपीठाने मदतीसंबंधी चर्चेदरम्यान विचारला.