शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

"फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी एकाच नाण्याच्या दोन बाजू’’ चीन, कलम ३७० वरील विधानांवरून भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 18:47 IST

Farooq Abdullah Statement News : फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा टोला भाजपा नेते संबित पात्रा यांनी लगावला आहे

ठळक मुद्देफारुख अब्दुल्ला आपल्या मुलाखतींमधून चीनच्या विस्तारवादी मानसिकतेला योग्य ठरवतातराहुल गांधींची हल्लीच्या काळातील काही विधाने ऐकली तर फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे दिसून येईलसर्जिकल स्ट्राइक आणि एरअर स्ट्राइकबाबत प्रश्न निर्माण करून राहुल गांधी पाकिस्तानात हीरो बनले होते. आता फारुख अब्दुल्ला चीनमध्ये हीरो बनले आहेत

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी चीनची मदत घेऊ असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काल केल्याने नव्या वादास तोंड फुटले आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी फारुख अब्दुल्लांचे हे विधान देशविरोधी असल्याचा आरोप केला आहे. तसेच फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा टोला लगावला आहे.फारुख अब्दुल्लांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संबित पात्रा म्हणाले की, फारुख अब्दुल्ला आपल्या मुलाखतींमधून चीनच्या विस्तारवादी मानसिकतेला योग्य ठरवतात. दुसरीकडे जर संधी मिळाली तर चीनची मदत घेऊन आम्ही कलम ३७० परत आणू ,असे म्हणत देशद्रोह करणारे विधान करतात. याच फारुख अब्दुलांनी पाकव्याप्त काश्मीर तुमच्या बापाचा आहे का, असे विधान केल होते. पाकिस्तान आणि चीनबाबत यांच्या मनात असलेली आपुलकी आणि भारताविरोधातील कठोरता अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.यावेळी संबित पात्रा यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, केवळ फारुख अब्दुल्लाच असे करतात असे नाही तर तुम्ही भूतकाळात डोकावून राहुल गांधींची हल्लीच्या काळातील काही विधाने ऐकली तर फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे दिसून येईल. सर्जिकल स्ट्राइक आणि एरअर स्ट्राइकबाबत प्रश्न निर्माण करून राहुल गांधी पाकिस्तानात हीरो बनले होते. आता फारुख अब्दुल्ला चीनमध्ये हीरो बनले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.यापूर्वी २४ सप्टेंबर रोजी फारुख अब्दुल्ला यांनी जर जम्मू काश्मीरमध्ये गेलात आणि लोकाना तुम्ही भारतीय आहात का असं विचारलं तर त्याचं उत्तर ते नाही असे देतील. बरं झालं असतं जर आम्ही चिनी असतो, असं विधान केलं होतं. देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्न उपस्थित करणे, स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह लावणे हे एका खासदाराला शोभते का, ही देशविरोधी विधाने नाहीत का, अशी विचारणाही संबित पात्रा यांनी केली आहे.दरम्यान, काल आज तक या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना फारुख अब्दुल्ला यांनी एलएसीवर जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी केंद्र सरकार जबादार आहे कारण त्यांनी कलम ३७० रद्द केले आहे, असा आरोप केला होता. चीनने कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला कधीही पाठिंबा दिलेला नाही. आता कलम ३७० चीनच्या मदतीने पुन्हा लागू करता येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे विधान केले होते.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSambit Patraसंबित पात्राFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाRahul Gandhiराहुल गांधीArticle 370कलम 370chinaचीन