शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

“पाकिस्तानचे समर्थन नाही, विजय साजरा होणे भाजपसाठी इशारा”: फारुक अब्दुल्लांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 9:08 AM

विजयोत्सवाच्या माध्यमातून काश्मीरमधील युवा पिढीने भाजपला एक स्पष्ट संदेश दिला आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देविजयोत्सवाच्या माध्यमातून काश्मीरमधील युवा पिढीने भाजपला स्पष्ट संदेश दिलायजम्मू-काश्मीरला अनुच्छेद ३७० परत करावाच लागेलआताच्या घडीला काश्मीर एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे धगधगत आहे

श्रीनगर: जागतिक टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानने केलेल्या भारताच्या पराभवानंतर जम्मू-काश्मीरमधील काही भागात मोठ्या प्रमाणात विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, आता त्यात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी उडी घेतली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला म्हणाले की, टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत काश्मीरमध्ये साजरा करण्यात आलेला विजय हा पाकिस्तानचे समर्थन करण्यासाठी नाही, तर भाजपला चिडवण्यासाठी होता. तसेच तो एक प्रकारे भाजपला इशाराही होता, असे सूचक विधान त्यांनी केले. 

केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द केले. त्याचाच हा परिणाम आहे. आताच्या घडीला काश्मीर एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे धगधगत आहे. त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो, त्यानंतर याचे काय परिणाम होतील, हे सांगू शकत नाही, असेही फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. पुँछ जिल्ह्यातील सुरनकोट येथील एका जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. 

भाजपला स्पष्ट संदेश दिला आहे

या विजयोत्सवाच्या माध्यमातून काश्मीरमधील युवा पिढीने भाजपला एक स्पष्ट संदेश दिला आहे. जम्मू-काश्मीरला अनुच्छेद ३७० परत करावाच लागेल. केंद्रीय गृहमंत्री दावा करतात की, अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये एकही गोळी चाललेली नाही. घराबाहेर सैन्य उभे केल्यावर हे कसे शक्य होते, असा प्रश्न ते विचारू इच्छितात, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

दोन देशांमध्ये भारतातील हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ

भारत हा पाकिस्तानशी युद्ध झाल्यास त्याच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. बजेटमधील मोठा हिस्सा देत आहे. मात्र, दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे जम्मू-काश्मीरमधील लोकांचे सँडविच होत आहे. या दोन देशांतील संघर्षामुळे स्थानिक हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण होत आहे, असा दावा अब्दुल्ला यांनी यावेळी बोलताना केला. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काश्मीरमध्ये असताना टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या विजयाचा आणि भारताच्या पराभवाचा जल्लोष साजरा होतो. हिंदुस्तानाविरोधात घोषणाबाजी होते, ही बाब चिंताजनक आहे. केंद्र सरकारनं या घटनेची नोंद गांभीर्यानं घ्यायला हवी, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून केली होती.  

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाPakistanपाकिस्तानT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१BJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर