शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Congress Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत फारुख अब्दुल्लांची एंट्री, म्हणाले- 'देशाची एकता राखणे काळाची गरज आहे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 13:55 IST

Congress Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा आज सकाळीच मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. बोदर्ली गावात पोहोचताच राहुल गांधी यांची आरती करण्यात आली.

Congress Bharat Jodo Yatra: कन्याकुमारीतून सुरू झालेली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' (Congress Bharat Jodo Yatra) जम्मू-काश्मीरमध्ये संपणार आहे. ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) हेदेखील काँग्रेसच्या यात्रेत सहभागी होणार आहेत. खुद्द फारुख अब्दुल्ला यांनीच ही माहिती दिली. देशाची एकता आणि अखंडता राखणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंत 'भारत जोडो यात्रा' सुरू केली आहे. सध्या ही यात्रा मध्य प्रदेशात असून, हळुहळू काश्मीरकडे जात आहे. दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी मीडियाला सांगितले की, “लखनपूरपासून जम्मू-काश्मीर सुरू होते, यात्रा तिथे पोहोचल्यावर मी राहुल गांधींसोबत यात्रेत सहभागी होईल. देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी आम्ही एकत्र येऊ. संघटित राहणे ही काळाची गरज आहे.” अब्दुल्ला सध्या संसदीय समितीच्या बैठकीसाठी नवी दिल्लीत आहेत.

भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रा आज सकाळीच मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. बोदर्ली गावात पोहोचताच या यात्रेचे जल्लोषात व पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. गावात पोहोचल्यावर राहुल गांधी यांची आरती करण्यात आली. त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्याशिवाय इतर सर्व नेते राहुल गांधींच्या दौऱ्यात सोबत आहेत.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा