शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

MBA पास तरुणाला नोकरी नाही; वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचं पोट भरण्यासाठी चालवतो हातगाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 17:46 IST

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी एमबीए पास असलेला तरुण हातगाडी चालवत आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यात वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी एमबीए पास असलेला तरुण हातगाडी चालवत आहे. त्याचे वडीलही हातगाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. तरुणाच्या बहिणींनी हॉकीमध्ये अनेक मेडल जिंकली आहेत. पटियाला येथे झालेल्या ऑल इंडिया सीनियर हॉकी टूर्नामेंटमध्ये त्याच्या बहिणींनी आपले कर्तृत्व दाखवले. अशा परिस्थितीत एमबीए उत्तीर्ण झालेल्या या तरुणाने सरकारकडे मदतीचं आवाहन केलं आहे.

लव कांत कठेरिया असं या तरुणाचं नाव आहे. त्याने 2019 मध्ये एमबीए पूर्ण केल्याचं सांगितलं. "मलाही अभ्यासादरम्यान शिष्यवृत्ती मिळाली. एमबीए पूर्ण केल्यानंतर माझ्या वडिलांचे निधन झाले. य़ाच दरम्यान, नोकरीसाठी खूप प्रयत्न केले, पण नोकरी मिळाली नाही. पप्पाही हातगाडी चालवायचे, त्यातून कुटुंबाचा खर्च चालायचा. तेच काम आता मी जबाबदारी म्हणून करतो" असं तरुणाने म्हटलं आहे. 

हातगाडी चालवून महिन्याभरात जवळपास पाच ते सहा हजार रुपये कमावत असल्याचं तरुणाने म्हटलं आहे. लव कांत कठेरिया याने दिलेल्या माहितीनुसार, "खर्च खूप आहेत. कधी सिलिंडर, कधी वीज बिल, कधी दूध… घराचा सर्व खर्च… इतक्या पैशात भागत नाही. यासोबतच भाऊ-बहिणीचे शिक्षण, आईचे औषध याकडेही पाहावे लागते. घरात तीन बहिणी, एक भाऊ आणि आई आहे. एक बहीण NIS करत आहे."

"एक बहीण एथलीट आहे, ती विभागीय स्तरावर खेळली आहे. तिने 2017 मध्ये इटावा आणि 2018 मध्ये हरदोई येथे रौप्य पदके जिंकली होती. अशा परिस्थितीत तरुणाला योगी सरकारकडून मदतीची आशा आहे. सरकारने मला नोकरी दिली नाही तरी माझ्या बहिणींना नोकरी द्या. माझ्या वडिलांवर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर आल्या आहेत. 6 हजारात घर चालवणे कठीण होत आहे" असंही तरुणाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.