शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

एन्काऊंटरच्या भीतीनं गुन्हेगारांचा पोलीस ठाण्यातच मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 13:23 IST

अनेक गुन्हेगार सध्या सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यात आश्रय घेत आहेत.

अनेकदा गुन्हेगार फरार होतात. पोलिसांपासून दूर राहण्याचा, शक्य तितका लांब पळण्याचा प्रयत्न करतात, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पोलिसांच्या हाती लागलो, तर आपले काही खरे नाही, अशी भीती गुन्हेगारांमध्ये असते. मात्र उत्तर प्रदेशात सध्या याच्या नेमके उलट घडताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील अनेक गुन्हेगार सध्या सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यात आश्रय घेत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, अनेक गुन्हेगार रात्रभर पोलीस ठाण्यातच मुक्काम करत आहेत. पोलीस ठाण्यात राहिलो, तरच सुरक्षित राहू, असा अनेक गुन्हेगारांचा समज आहे आणि यामागील मुख्य कारण आहे गुन्हेगारांनी घेतलेली एन्काऊंटरची धडकी.गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात एन्काऊंटर केले जात आहेत. त्यामुळे अनेक गुन्हेगारांची भीतीने गाळण उडाली आहे. पोलिसांपासून दूर पळण्याचा प्रयत्न केल्यास एन्काऊंटर होणार, अशी भीती गुन्हेगारांना सतावत आहे. त्यापेक्षा पोलीस ठाण्यात गेलेले बरे, असा विचार अनेक गुन्हेगारांनी केला आहे.  सीतापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच मनोज कुमार नावाच्या गुन्हेगाराचा एन्काऊंटर केला. त्याच्यावर २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सरपंचाची हत्या, लूटमार आणि खंडणी प्रकरणात मनोज कुमार पोलिसांना हवा होता. मनोज कुमार प्रमाणेच जवळपास डझनभर गुन्हेगारांना सीतापूर पोलिसांनी यमसदनी धाडले आहे. याशिवाय पोलिसांनी त्यांच्या हद्दीत सक्रीय असलेल्या गुन्हेगारांची यादीदेखील केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे अनेकजण पोलिसांना स्वत:हून शरण आले आहेत. तर काहीजण एन्काऊंटरच्या भीतीने थेट पोलीस स्टेशन गाठत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारे गुन्हेगार पोलीस ठाण्यांमध्ये दिसू लागले आहेत.  

टॅग्स :Crimeगुन्हाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस