शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बिहारमध्ये एनडीएत फूट? भाजपाच्या मित्रपक्षाने दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 14:47 IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा अद्याप झाली नसली तरी या वर्षअखेरीपर्यंत बिहारमधील निवडणुका होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देलोकजनशक्ती पक्षाने बिहारमधील सर्व २४३ जागांवर लढण्यासाठी तयार बिहारमध्ये आता कुठल्याही एका व्यक्तीचा अजेंडा चालणार नाही बिहारमध्ये आता कुठल्याही एका व्यक्तीचा अजेंडा चालणार नाही

पाटणा - एकीकडे देशातील कोरोनाच्या फैलावाचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत असताना दुसरीकडे बिहारमधील विधानसभा निवडणुकीची तारीखही जवळ येत आहे. या निवडणुकीच्या तारखेची घोषणा अद्याप झाली नसली तरी या वर्षअखेरीपर्यंत बिहारमधील निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीपूर्वी भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. बिहारमधील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि जेडीयूचा मित्रपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाने बिहारमधील सर्व २४३ जागांवर लढण्यासाठी तयार असल्याचे विधान केले आहे. तसेच कोरोना संकटाचा सामना करण्याच्या नितीश कुमार यांच्या रणनीतीवरही लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.याबाबत चिराग पासवान म्हणाले की, बिहारमध्ये आता कुठल्याही एका व्यक्तीचा अजेंडा चालणार नाही. जर एनडीएमधील तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असतील तर तिघांचाही अजेंचा असेल. तसेस बिहारसाठी एनडीएला किमान समान कार्यक्रम बनवावा लागेल. जर असा कार्यक्रम आता ठरला नाही तर निवडणुकीनंतरही तो ठरणार नाही. तसेच बिहारमध्ये एनडीए किंवा अशा आघाडीचे सरकारा बनेल ज्यामध्ये लोकजनशक्ती पक्ष सहभागी असेल तर ते सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच बनेल.

दरम्यान, चिराग पासवान यांनी सध्याची वेळ ही बिहार विधानसभेची निवडणूक घेण्यास योग्य नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, बिहारमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यासाठी ही योग्य वेळ नाही. त्यामुळे निवडणूक टाळली पाहिजे. याबाबतचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा. पण सध्याची स्थिती निवडणूक घेण्यास अनुकूल नाही. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर केवळ चार ते सहा आठवड्यात निवडणुकीचा प्रचार होतो, यामध्ये सभा, मेळावे होतात. हे सर्व सोशल डिस्टंसिंग पाळून करणं कसं शक्य आहे, असा सवाल चिराग पासवासन यांनी उपस्थित केला. दरम्यान, चिराग पासवान यांनी भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचीही भेट घेतली असून, तेव्हाही त्यांनी आपण बिहार निवडणुकीसाठी तयार नसल्याचे सांगितले होते.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूकBJPभाजपाLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीJanta Dal Unitedजनता दल युनायटेड