शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

महिला इंस्पेक्टरनं सांगिली राकेश टिकै यांची 'असलियत'!, पोलिसांनी दिला 3 दिवसांचा वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 15:18 IST

दिल्ली पोलिसांनी टिकैत यांना नोटीस बजावत, त्यांनी तीन दिवसांत सांगावे, की दिलेला शब्द मोडल्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई का केली जाऊ नये? असे म्हटले आहे. 

नवी दिल्ली - भारतीय किसान यूनियन (BKU)चे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी गाझीपूर अंडरपासवर शेतकऱ्यांच्या जमावाला भडकावले होते, असा दावा दिल्लीपोलिसातील निरीक्षक (इंस्पेक्टर) पुष्पलता यांनी केला आहे. यातच टिकैत यांनीही एक असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे दिल्ली पोलिसांची शंका अधिकच बळावली आहे. लाल किल्ल्यावर पोलिसांनी गोळी का चालवली नाही? असे वक्तव्य राकेश टिकैत यांनी केले आहे. विशेष म्हणजे हे वक्तव्य त्यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत केले आहे.

राकेश टिकैत यांच्या वक्तव्याचा अर्थ काय? राकेश टिकैत यांच्या या वक्तव्यावर आता लोक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. लोक प्रश्न करत आहेत, की लाल किल्ल्यावर उपद्रव केला, की पोलीस गोळी चालवण्यास मजबूर होतील आणि नंतर देशभरात उद्रेक होईल, अशीच त्यांची योजना होती का?  तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी टिकैत यांना नोटीस बजावत, त्यांनी तीन दिवसांत सांगावे, की दिलेला शब्द मोडल्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई का केली जाऊ नये? असे म्हटले आहे. 

राकेश टिकैत यांच्या टेंट बाहेर लावण्यात आली नोटीस -दिल्ली पोलिसांनी गाझीपूर बॉर्डरवर आंदोलन स्थळी जाऊन टिकैत यांच्या टेंटला नोटीस लावली आहे. या नोटिशीत, 'आपल्याला अपल्या संघटनेशी संबंधित, असे हिंसक कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांची नावे सांगण्याचे निर्देश दिले जात आहेत. आपल्याला 3 दिवसांच्या आत आपले उत्तर द्यायचे आहे,' असे म्हणण्यात आले आहे.

इंस्पेक्टर पुष्पलता यांचा दावा -राकेश टिकैत यांच्या हेतूवर उपस्थित झालेला प्रश्न अत्यंत गंभीर आहे. कारण, गाझीपूर बॉर्डरहून लाल किल्ल्याकडे जाण्यासाठी राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना केवळ प्रेरितच केले नाही, तर त्यांचे नेतृत्वही केले. टिकैत यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टरवरील शेतकऱ्यांची रॅली गाझीपूर बॉर्डरहून दिल्लीकडे वळल्यानंतर दिल्ली पोलिसातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी ती आडवली. त्या ट्रॅक्टरसमोर उभ्या राहिल्या. यानंतर शेतकऱ्यांनी बॅरिकेड तोडून दुसरीकडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावर इंस्पेक्टर पुष्पलता आणि पोलीस कर्मचारी सुमन कुशवाहा ट्रॅक्टरच्या बोनटला लटकल्या. हे सर्व राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत सुरू होते.

पुष्पलता या गाझीपूर अंडरपासवर तैनात होत्या. त्यांनी सांगितले, की ट्रॅक्टर परेड सुरू होण्याची निर्धारित वेळ 12 वाजताची  होती. मात्र, 9.30 वाजता ही रॅली सुरू करण्यात आली. यावेळी अंडरपासच्या उल्ट्या दिशेने आनंद विहारकडे जात असलेल्या लोकांतील काही लोक परत आले आणि अंडरपासमध्ये लागलेले बॅरिकेड तोडू लागले. एका वृत्तवाहीनीशी बोलताना पुष्पलता यांनी सांगितले, "राकेश टिकैत आमच्याकडे दोन-तीन वेळा आले. ते आमच्या समोर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बंद करायला सांगत होते, मात्र इशारा, पुढे सरकण्याचा करत होते." 

 

टॅग्स :delhi violenceदिल्लीFarmer strikeशेतकरी संपPoliceपोलिसdelhiदिल्ली