शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

काळ्या पैशावरील अहवालाचे अर्थमंत्रालयाकडून परीक्षण

By admin | Published: January 04, 2016 2:28 AM

देशात व देशाबाहेर काळा पैसा किती आहे, याबाबत सरकारकडे असलेल्या अहवालाचे परीक्षण केले जात असून अहवाल आल्यानंतर जवळपास दीड वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते

नवी दिल्ली : देशात व देशाबाहेर काळा पैसा किती आहे, याबाबत सरकारकडे असलेल्या अहवालाचे परीक्षण केले जात असून अहवाल आल्यानंतर जवळपास दीड वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने अधिकाराच्या अंतर्गत दिली आहे. २०११ मध्ये तत्कालीन यूपीए शासनाने देशात व देशाबाहेर किती बेहिशेबी पैसा व संपत्ती आहे याचा आढावा घेण्याचे ठरविले. त्यानुसार दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (एनआयपीएफपी), नॅशनल कौन्सिल आॅफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) व नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फिनान्शियल मॅनेजमेंट, फरीदाबाद (एनआयएफएम) या तीन संस्थांना हा अभ्यास करण्याचे काम दिले. त्यांच्याकडून अठरा महिन्यांत अहवाल अपेक्षित होता.या संस्थांनी अनुक्रमे ३० डिसेंबर २०१३, १८ जुलै २०१४ व २१ आॅगस्ट २०१४ रोजी आपापले अहवाल दिले, अशी माहिती पीटीआयने दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जात अर्थमंत्रालयाने दिली. अर्थमंत्रालयाने उत्तरात म्हटले आहे की, या अहवालाचे परीक्षण व त्यावर करावयाचे उपाय यावर सरकार विचार करीत आहे. शिवाय अहवाल व सरकारचे मत अर्थखात्याच्या स्थायी समितीकडे सोपविले आहे.यावर स्थायी समितीचे मत जाणून घेतले जात आहे. यापेक्षा जास्त तपशील देता येणार नाही, कारण माहितीचा अधिकार कायदा २००५ च्या कलम ८ (१) (सी) नुसार संसदेचा हक्कभंग करणारी माहिती देणे या कलमान्वये वगळण्यात आली आहे. या योजनेनुसार ज्यांनी आपली संपत्ती जाहीर केली, त्यांच्याकडून २६ नोव्हेंबर २०१५ पर्यंत १६.६९ कोटी रुपयांचा कर सरकारकडे जमा झाला, असे अर्थमंत्रालयाने उत्तरात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)