शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

नागरिकांच्या खांद्यापर्यंत आलंय पुराचं पाणी, फिर भी दिल है हिंदुस्तानी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 12:18 IST

भारत देश विकसनशील असून शेवटच्या टोकातील नागरिकांपर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचविण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलं आहे. मात्र, अद्यापही देशातील अनेक भागात नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते.

ठळक मुद्देया अंगणवाडी सेविकांच्या खांद्यापर्यंत पावसामुळे पुराचे पाणी आलंय. त्यांची शाळाही पावसाच्या पाण्यातच तरलेली दिसतेय. मात्र, या परिस्थितही या महिलांनी तिरंग्याला सलामी दिली.

पाटणा - देशात शनिवारी 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावर कोरोनाचं सावट असल्याने अतिशय साध्या पद्धतीने देशभरात आणि विदेशात असलेल्या नागरिकांनी परदेशात तिरंगा फडकवला. नेटीझन्सनेही सोशल मीडियातून देशभक्ती व देशप्रेमाच्या भावना व्यक्त केल्या. मात्र, दुर्गम भागातील नागरिकांची तीव्र इच्छाशक्ती पाहून, लाख असतील अडचणी तरीही आम्ही तत्पर सदैव तिरंग्यासाठी, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बिहारमधील पूर दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांनी असाच स्वातंत्र्य दिन साजरा करुन देशभक्तीचं उदाहरण दिलंय. 

भारत देश विकसनशील असून शेवटच्या टोकातील नागरिकांपर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचविण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलं आहे. मात्र, अद्यापही देशातील अनेक भागात नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागतो. बिहारमध्ये सध्या कोरोना महामारीसोबत पावसाळ्यातील पुराचे संकट आहे. विशेषत: दरभंगा येथील परिस्थिती अतिशय हालाखीची बनली आहे. मात्र, तरीही येथील अंगणवाडीसेविकांनी देशभक्तीचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलंय. या महिलांच्या खांद्यापर्यंत आलंय पुराचं पाणी, फिर भी दिल है हिंदुस्तानी... हेच त्यांनी दाखवून दिलंय.

या अंगणवाडी सेविकांच्या खांद्यापर्यंत पावसामुळे पुराचे पाणी आलंय. त्यांची शाळाही पावसाच्या पाण्यातच तरलेली दिसतेय. मात्र, या परिस्थितही या महिलांनी तिरंग्याला सलामी दिली. तर, येथील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी नावेत (बोट) उभारून ध्वजारोहन केलं. संकटाच्या काळातील या ध्वजारोहनावेळी वंदे मातरमच्या घोषणाही देण्यात आल्या. या नागरिकांच्या देशभक्तीने देशासाठी कायपण... हेच दाखवून दिलंय. 

दरभंगा जिल्ह्यातील बिरौल मंडल मुख्यालयात अंगणवाडीसेविकांनी पुराच्या पाण्यात उतरुन ध्वजारोहन केले. ज्यांनी या महिलांचा ध्वजारोहन समारंभ पाहिला, प्रत्येकाने तिरंग्यासोबत या महिलांच्या देशभक्तीलाही सॅल्यूट केला. सोशल मीडियावरही या महिलांनी तिरंग्याला दिलेल्या सलामीचे फोटो व्हायरल झाले आहेत.  

टॅग्स :IndiaभारतIndependence Dayस्वातंत्र्य दिनBiharबिहारfloodपूर