शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Nagaland Killing: सुरक्षा दलांचे अपयश नव्हता नागालँडमधील गोळीबार? धक्कादायक माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 12:12 IST

Nagaland Killing: नागालँडमध्ये लष्कराच्या गोळीबारात झालेल्या १४ सामान्य नागरिकांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना कशी घडली याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.

कोहिमा - नागालँडमध्ये लष्कराच्या गोळीबारात झालेल्या १४ सामान्य नागरिकांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना कशी घडली याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना गुप्तहेर खात्याचे अपयश नव्हते. बंडखोर गटाचे लोक कुठे जात आहेत, याबाबत सुरक्षा यंत्रणांना विश्वसनीयरीत्या इनपुट देण्यात आले होते. नागालँडमधील मोन जिल्ह्यात एकापाठोपाठ एक अशा गोळीबाराच्या तीन घटना घडल्या होत्या. यामध्ये सुमारे १४ लोक मारले गेले होते. तर अन्य ११ जण जखमी झाले होते. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार गोळीबाराची ही घटना चुकीच्या ओळखीमुळे झाली असावी. दरम्यान, या घटनेनंतर झालेल्या दंगलीमध्ये एका जवानाचाही मृत्यू झाला आहे. 

सूत्रांनी सांगितले की, दोन एजन्सींकडून गोपनीय माहितीची  तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये सेना आणि टास्क फोर्सचा समावेश आहे. मात्र गुप्तचर सूत्रांनी सांगितले की, अखेरच्या क्षणी कुणीतरी फुटीरतावाद्यांना माहिती दिली आणि त्यांनी या आंदोलनात स्थानिक लोकांना सामावून घेण्यात यश मिळवले होते. 

सूत्रांच्या माहितीनुसार टास्क फोर्सला यामध्ये सामान्य नागरिक सहभागी झाले आहेत याची माहिती नव्हती. एवढेच नाही तर यादरम्यान, अॉपरेशनची तयारी करण्यात आली. मात्र ग्रामस्थांनी बंडखोरांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते मारले गेले, असाही दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, लष्कराने या घटनेच्या कोर्ट अॉफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. तसेच यादरम्यान एक जवान मृत्युमुखी पडला तर इतर काही जवान जखमी झाले. ही घटना आणि त्यानंतर घडलेली घटना  हे सारे काही दुर्दैवी असल्याचे लष्कराने म्हटले आहे. घटनेची उच्च स्तरीय चौकशी सुरू आहे. नागालँडमधील सरकारने आयजीपी नागालँड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

गोळीबाराची ही घटना शनिवारी तेव्हा घडली होती जेव्हा संध्याकाळी काही खाण कामगार पिक अप गाडीमधून गात घरी जात होते. दरम्यान, लष्कराच्या जवानांना एका बंदी घातलेल्या अतिरेकी संघटनेच्या हालचालींची माहिती मिळाली होती. त्याच गैरसमजातून जवानांनी गोळीबार केला आणि त्यात ही दुर्घटना घडली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारत