शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर कामकाज तहकूब; आता १ फेब्रुवारीच्या बजेटकडे देशाचं लक्ष

By महेश गलांडे | Updated: January 29, 2021 14:51 IST

Budget Session 2021: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्पापूर्वी लोकसभेत आर्थिक सर्व्हे सादर केला. यानंतर हा आर्थिक सर्व्हे संसदेच्या वरीष्ठ सभागृहातही सादर होईल.

ठळक मुद्देराष्ट्रपती रामनाद कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात देशातील विविध मुद्द्यावर चर्चा केली. तसेच, देशासाठी आणि जनतेसाठी सरकार कटिबद्ध असून जनहिताचे निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी वरिष्ठ सभागृहाच्या अनेक सदस्यांसह कोविड चाचणी करून घेतली. अँटिजेन चाचण्यांत कोणीही सकारात्मक आढळले नाही. त्यानंतर, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषण केल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मीडियाशी संवाद साधला. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आर्थिक सर्व्हे सादर केल्यानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे. त्यामुळे, आता सोमवारी सकाळी 11 वाजताच सभागृहात चर्चेला सुरुवात होईल.  

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्पापूर्वी लोकसभेत आर्थिक सर्व्हे सादर केला. यानंतर हा आर्थिक सर्व्हे संसदेच्या वरीष्ठ सभागृहातही सादर होईल. मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमण्यम यावर दुपारी ३.३० वाजता एका पत्रकार परिषदेत याची माहिती देतील. मात्र, लोकसभेत आर्थिक सर्व्हे सादर करण्यात आल्यानंतर आज संपूर्ण दिवसासाठी सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलंय. त्यानंतर, उद्या आणि परवा सुट्टी असल्यामुळे आता थेट 1 फेब्रुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आलीय, असंच म्हणता येईल. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन हेही कोविड नियमावलीच्या निर्बंधांतच होत आहे. कोविड महामारीचा जोर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कमी होत होता. त्यामुळे हिवाळी अधिवेशन झाले नाही.आता, लोकसभा आणि राज्यसभेतील अधिकारीव व कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या करुन घेण्यात आल्या आहेत.  आता, 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रपतींचं सर्वसमावेशक भाषण

राष्ट्रपती रामनाद कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात देशातील विविध मुद्द्यावर चर्चा केली. तसेच, देशासाठी आणि जनतेसाठी सरकार कटिबद्ध असून जनहिताचे निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे दिल्लीतील आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा ओझरता उल्लेख करत, शेती विधेयक हे देशातील 10 कोटी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आणल्याचंही ते म्हणाले. तूर्तास, कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. माझं सरकार न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतं. ते न्यायालयाच्या आदेशांचं पालन करेल, असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला. यावेळी, राष्ट्रपतींनी गेल्या वर्षातील सरकारचे महत्वपूर्ण निर्णय आणि लॉकडाऊन काळातील परिस्थितीतील कार्याचाही उल्लेख केला. 

मोदींचं आवाहन

'आज या दशकातील पहिल्या वहिल्या अधिवेशनाला सुरुवात होतेय. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे दशक अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याची एक सुवर्णसंधी देशासमोर आली आहे. या दशकाचा संपूर्ण वापर व्हायला हवा. हे ध्यानात ठेवूनच या अधिवेशनात पुढच्या दशकभराकडे लक्ष देणारी चर्चा व्हायला हवी, असे मोदींनी मीडियाशी बोलताना म्हटले. तसेच, मला विश्वास आहे की नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण आपलं योगदान देण्यात मागे राहणार नाही' असंही पंतप्रधान म्हणाले.

संसद सदस्यांचीही होणार चाचणी

संसद सदस्यांना अशाच चाचण्यांतून जावे लागेल आणि येथे तीन दिवस त्या होतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ३३ बैठका शुक्रवारपासून सुरू होतील. २०२१-२०२२ वर्षासाठीचा अर्थसंकल्प कोविड महामारीचा उद्रेक झाल्यानंतर पहिल्यांदाच सादर होत आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाMember of parliamentखासदारParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीbudget 2021बजेट 2021