शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

सीबीएसई १२ वीत दिल्लीची रक्षा पहिली

By admin | Published: May 29, 2017 5:06 AM

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत देशभरातील १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधून प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत देशभरातील १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधून प्रथम येण्याचा मान दिल्लीच्या रक्षा गोपाल या विद्यार्थिनीने तब्बल ९९.६ टक्के (५०० पैकी ४९८) गुण मिळवून पटकाविला आहे.चंदीगडची भूमी सावंत-डे या विद्यार्थिनीने ५०० पैकी ४९७ गुण मिळवून दुसरे स्थान मिळविले आणि ५०० पैकी ४९६ एवढे समान गुण मिळालेल्या आदित्य जैन व मन्नत लुथ्रा या दोघांनी देशात तिसरे स्थान पटकावले आहे.परीक्षा दिलेल्या देशातील एकूण १० लाख २० हजार ७६२ विद्यार्थ्यांपैकी ८ लाख ३७ हजार २२९ म्हणजेच ८२.२ टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या ८३.०५ टक्यांहून यंदाचे उत्तीर्णतेचे प्रमाण कमी आहे. मात्र यंदा १०हजार ९१ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक तर ६३ हजार २४० विद्यार्थ्यांनी ९० टक्कयांहून अधिक गुण मिळविले.परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत विशेष हेल्पलाइन चालविली. त्यावर फोन करणाऱ्यांचे मनोवैज्ञानिक समुपदेशन करण्यासाठी ६५ समुपदेशक नेमण्यात आले होते.