शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू

By admin | Published: June 09, 2017 3:50 AM

मंदसौरमध्ये पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी गुरुवारी दिली.

भोपाळ : मंदसौरमध्ये पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी गुरुवारी दिली. आधी पोलिसांनी गोळीबार केलाच नव्हता, असा दावा मध्य प्रदेश सरकार करीत होते. पण पोलीस गोळीबार करीत असल्याची चित्रफीत जाहीर झाल्यानंतर गृहमंत्र्यांना ही कबुली द्यावी लागली. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा दावा सरकारने केला असला तरी पोलिसांनी बुधवारी रात्रीपासून सुमारे ७0 शेतकऱ्यांना अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यामुळे मंदसौर भागात अद्याप तणाव असून, तिथे रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. पोलीस अधीक्षक ओ. पी. त्रिपाठी व जिल्हाधिकारी स्वतंत्रकुमार यांच्यामुळे मंदसौरमधील वातावरण बिघडले, असा शेतकऱ्यांचा आरोप होता. अखेर त्या दोघांच्या बदलीचे आदेशही सरकारला द्यावे लागले. त्या भागातील आयपीएस व आयएएस अशा आठ अधिकाऱ्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. त्यांनी परिस्थिती नीट हाताळली नाही, असे सरकारचेही मत असल्याचे सांगण्यात येते. पिपलीमंडीचे पोलीस निरीक्षक अनिलसिंह ठाकूर यांना फिल्ड ड्यूटीवरून हटविण्यात आले आहे.राज्यात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे १,१०० जवान तैनात करण्यात आले आहेत. स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याचे पोलीस सांगत आहेत. डीआयजी अविनाश शर्मा पिपलीमंडीत स्वत: लक्ष ठेवून आहेत. कर्जमाफी आणि शेतमालाला रास्त भाव मिळण्याच्या मागणीसाठी येथील शेतकरी सात दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. संतप्त शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी सरकारने ‘लोन सेटलमेंट स्कीम’ सुरू केली आहे. सहा लाख शेतकऱ्यांना लाभ देत ६,००० कोटी सरकारजमा करणार आहे. >शेतकऱ्यांच्या पैशातून गोळ्यांची खरेदी?नवी दिल्ली : कृषिकल्याण उपकरातून सरकार गोळीबाराच्या गोळ्या खरेदी करीत आहे का? यासाठीच नागरिक हा कर भरत आहेत का? असा संतप्त सवाल माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केला आहे. येचुरी यांनी टिष्ट्वट केले आहे की, तीन वर्षांतील कृषिमंत्रालयाच्या कामाची माहिती देण्यासाठी कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती; पण ती आता रद्द करण्यात आली आहे....तर उत्तर प्रदेशातही मंदसौर घडेल!उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत नाही तर राज्यात मंंदसौरसारख्या परिस्थितीला तोंड द्यायची तयारी ठेवावी, असा इशारा राष्ट्रीय किसान मंचचे अध्यक्ष शेखर दीक्षित यांनी गुरुवारी येथे दिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पीक कर्जमाफीची योजना जाहीर केली होती. त्यावर टीका करताना दीक्षित म्हणाले की, शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत तो त्यांना किमान आधारभूत किंमत मिळण्याचा व हा भाव बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळतच नाही.