शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

पाच सरकारी विमा कंपन्यांचे २५ टक्के भांडवल विकणार

By admin | Published: January 19, 2017 4:45 AM

कंपन्यांमधील सरकारचे २५ टक्के भागभांडवल लोकांना विकण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.

नवी दिल्ली : सर्वसाधारण विमा क्षेत्रातील पाच सरकारी कंपन्यांचे भांडवली बाजारांमध्ये ‘लिस्टिंग’ करण्यास आणि या कंपन्यांमधील सरकारचे २५ टक्के भागभांडवल लोकांना विकण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, युनायटेड इंडिया इन्श्युरन्स, ओरिएंटल इन्श्युरन्स, नॅशनल इन्श्युरन्स आणि भारतीय सर्वसाधरण विमा महामंडळ या पाच विमा कंपन्यांचे शंभर टक्के भागभांडवल सध्या सरकारकडे आहे. आता या भांगभांडवलातील सरकारचा हिस्सा २५ टक्क्यांनी कमी करून तो ७५ टक्क्यांवर आणण्यात येईल. तसेच या कंपन्यांचे भांडवली बाजारांमध्ये ‘लिस्टिंग’ही करण्यात येईल.सरकारी सार्वजनिक विमा कंपन्यांचा कारभार अधिक पारदर्शी व उत्तरदायी व्हावा यासाठी त्यांच्या भागभांडवलात जनतेला सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या अर्थ संकल्पात केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबीविषयक समितीने बुधवारी त्यास तत्वत: मंजुरी दिली. सदर प्रस्तावानुसार या पाच कंपन्यांच्या ‘लिस्टिंग’ची प्रक्रिया त्वरित सुरू होणार आहे. ‘सेबी’ आणि ‘इरडा’ यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या कंपन्यांमधील २५ टक्के सरकारी भागभांडवल ‘आॅफर फॉर सेल’ या पद्धतीने टप्प्याटप्प्याने विकले जाईल.भांडवली बाजारात केंद्राच्या पब्लिक सेक्टर एन्टरप्राईज (सीपीएसई) व एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) ला आजवर मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सरकारी कंपन्यांमधे गुंतवणुकीबाबत खाजगी गुंतवणूकदारांचा उत्साह लक्षणीय आहे.मंत्रिमंडळाच्या ताज्या निर्णयामुळे सरकारी इन्शुरन्स कंपन्या, गुंतवणूकदार व सरकार अशा तिन्ही पक्षांचा त्यामुळे फायदा होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)>इलेक्ट्रॉनिक उद्योगास प्रोत्साहनइलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उत्पादनवाढीला चालना देण्यासाठी या क्षेत्रातल्या उद्योगांना10000 कोटी रूपयांचे उत्तेजन अनुदान (इन्सेन्टिव्ह) देण्याचा निर्णयही या बैठकीत झाल्याने इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. या इन्सन्टिव्ह योजनेची मुदत येत्या १८ मार्च पर्यंत आहे.>‘लिस्टिंग’चे अपेक्षित फायदेवाढीव निधी व भांडवल यासाठी सरकारवर अवलंबून न राहता त्याची उभारणी भांडवली बाजारातून करता येईल.‘लिस्टिंग’ची सकंतीची पूर्वअट म्हणून या कंपन्यांचे व्यवस्थापन सुधारेल व त्यांची लेखापुस्तके लिहिण्याची पद्धत अधिक पारदर्शी होईल.जाब विचारायला खासगी भागधारकही आल्याने व्यवस्थापन अधिक उत्तरदायी होईल.