शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

Assembly Election 2021: निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 16:11 IST

assembly election 2021: पाचही राज्यातून समोर येत असलेली कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी आहे, असे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देनिवडणूक असलेल्या ५ राज्यांत कोरोनाचा विस्फोट५ राज्यांतील कोरोना मृत्यूदर ४५ टक्क्यांनी वाढलाकोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी

नवी दिल्ली: आताच्या घडीला देशभरात केवळ दोनच गोष्टींची सर्वाधिक चर्चा आहे. एक म्हणजे कोरोना आणि दुसरे म्हणजे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका. (assembly election 2021) मात्र, गेले अनेक दिवस ज्या गोष्टीची भीती होती, तीच खरी ठरताना दिसत आहे. गेल्या १५ दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. १ ते १४ एप्रिल या कालावधीत आसाममध्ये ५३२ टक्के, बंगालमध्ये ४२० टक्के, तामिळनाडूत १५९ टक्के, पुदुच्चेरीत १६५ टक्के, तर केरळमध्ये १०३ टक्क्यांनी कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (five state assembly election rallies proved to be fatal corona speed increases and hike 45 percent deaths )

गेल्या १५ दिवसांत निवडणुका असलेल्या पाच राज्यातील कोरोना मृत्यूचे प्रमाण ४५ टक्क्यांनी वाढल्याची माहिती मिळाली आहे. पश्चिम बंगालमधील ४ टप्प्यांचे मतदान अद्याप व्हायचे आहे. त्यामुळे येथील आकडा काही दिवसांनी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पाचही राज्यातून समोर येत असलेली कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी आहे, असे सांगितले जात आहे. 

दिलासादायक! यंदा देशात सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

आसाममध्ये ५३२ टक्के कोरोना रुग्णवाढ

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आसाममध्ये केवळ ५३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, फक्त ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत ३ हजार ३९८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर, १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याचाच अर्थ आसाममध्ये गेल्या १४ दिवसांमध्ये तब्बल ५३२ टक्क्यांनी कोरोना रुग्णसंख्या वाढली. 

बंगालमध्ये ४२० टक्के कोरोना रुग्णवाढ

पाच राज्यांतील निवडणुकांपैकी सर्वाधिक चर्चा आहे, ती पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेकांनी बंगालमध्ये तळ ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत कोरोना संसर्गालाही मोठा जोर आल्याचे चित्र आहे. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत बंगालमध्ये ८ हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत बंगालमध्ये ४१ हजार ९२७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून, १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना परिस्थिती गंभीर; निवडणूक आयोगाने बोलावली सर्वपक्षीय बैठक

पुदुच्चेरीमध्ये १६५ टक्के कोरोना रुग्णवाढ

पुदुच्चेरीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अन्य केंद्र शासित प्रदेशांच्या तुलनेत कमी होती. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत प्रतिदिन केवळ ५० नव्या रुग्णांची नोंद होत होती. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत १४०० नवे कोरोना रुग्ण पुदुच्चेरीत आढळून आले होते. तर, ९ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत ३ हजार ७२१ कोरोनाबाधितांची नोंद या ठिकाणी करण्यात आली. तर, १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

तामिळनाडूत १५९ टक्के कोरोना रुग्णवाढ

तामिळनाडूमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना निवडणुकांच्या प्रचारसभांमुळे यात भर पडल्याचे पाहायला मिळत आहे. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत तामिळनाडूमध्ये २५ हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, १६३ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत कोरोनाबाधितांची संख्या ६५ हजारांच्या घरात गेली असून, याच दरम्यान २३२ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. 

कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक; निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे निधन

केरळमध्ये १०३ टक्के कोरोना रुग्णवाढ

काही दिवसांपूर्वी केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. देशभरात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असताना केरळमध्ये मात्र उच्चांकी आकडेवारी समोर येत होती. निवडणुकांतील प्रचारासभानंतर यात आणखीनच भर पडल्याचे सांगितले जात आहे. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत केरळमध्ये ३० हजार ३९० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, १९९ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत केरळमध्ये तब्बल ६१ हजार ७९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, याच दरम्यान २०४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Puducherry Assembly Elections 2021पुदुचेरी विधानसभा निवडणूक २०२१Central Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार