शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
2
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
3
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
4
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
6
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
7
"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'
8
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
9
एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन 
10
भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
11
Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
12
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
13
गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?
14
पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
16
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
17
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
18
"पराभवाच्या भीतीमुळेच विरोधकांची मतदार यादीवरून ओरड", भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला 
19
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
20
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

पाच वर्षांत रेल्वेत आमूलाग्र परिवर्तन पाहायला मिळेल

By admin | Published: November 14, 2016 1:27 AM

दरवर्षी ८00 कोटींहून अधिक व रोज २.३0 कोटी प्रवाशांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे जगातील सर्वात स्वस्त सेवा पुरवणारी यंत्रणा आहे.

नवी दिल्ली : दरवर्षी ८00 कोटींहून अधिक व रोज २.३0 कोटी प्रवाशांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे जगातील सर्वात स्वस्त सेवा पुरवणारी यंत्रणा आहे. प्रत्येक प्रवाशाच्या १ किलोमीटरच्या प्रवासासाठी रेल्वेला ७४ पैसे खर्च येतो, पण भाड्यापोटी त्याच्याकडून अवघे ३७ पैसे मिळतात. तोटा सहन करूनही रेल्वे २४ तास करते आहे. त्यामुळे रेल्वेचे पुनरूज्जीवन करण्यात येणार असून, येत्या ५ वर्षात त्यात आमुलाग्र परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळेल, असे उद्गार रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरुणेंद्र कुमार मित्तल यांनी काढले.मित्तल म्हणाले, दिल्ली-मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर डिसेंबर २0१९ पर्यंत पूर्ण होईल. दिल्ली-हावडा कॉरिडॉरही लवकर सुरू व्हावा असे प्रयत्न आहेत. या दोन्ही मार्गांवरून मालवाहतूक बंद झाली, की प्रवासी गाड्यांची गती वाढेल. राजधानी, शताब्दीसारख्या ट्रेन्स ताशी १६0 कि.मी. वेगाने, मेल एक्सप्रेस ताशी ८0 कि.मी. वेगाने, पॅसेंजर व मालवाहतुकीच्या ट्रेन्स ताशी ५0 कि.मी. वेगाने धावू लागतील आणि प्रवासाचा वेळ वाचेल.आधुनिकीकरणासाठी आम्ही जीवन वीमा महामंडळाकडूनदीड लाख कोटी रुपयांचे कर्ज उचलले. बाजारपेठेत रोखे व बाँडसच्या माध्यमातून पैसे उभे केले. काही प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय वित्तिय संस्थांचीही मदत होत आहे. रेल्वे वाहतुकीसाठी दरवर्षी १२ हजार कोटी रुपयांची वीज व १८ हजार कोटी रुपयांचे डिझेल असे ३0 हजार कोटी लागतात. त्यात १0 टक्के बचत करण्याचे उद्दिष्ट आहे. वीजनिर्मिती केंद्राशी वाटाघाटी करून स्वस्त दरात वीज मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मित्तल म्हणाले. ईशान्येकडील राज्यांत याच वर्षापासून ब्रॉडगेज रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. पाच वर्षांत रेल्वेचे शून्य अपघात, अचून वेळापत्रक, मागेल त्याला प्रवासाचे आरक्षण, गाड्यांमध्ये बायो टॉयलेटमध्ये सुरू, गार्डरहित रेल्वे, क्रॉसिंगचे उच्चाटन असे महत्वाचे निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)