शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

राजस्थानच्या वाळवंटात पूर तर काही राज्ये पाण्यासाठी तरसली; भारतात पावसाचा पॅटर्न बदलतोय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 16:24 IST

भारतात मान्सूनचा पॅटर्न झपाट्याने बदलतोय, ज्यामुळे एकतर कमी वेळेत जास्त पाऊस पडतोय किंवा अजिबात पडत नाहीये.

नवी दिल्ली: सध्या मध्य प्रदेशात पावसाने थैमान घातले आहे, गेल्या तीन दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. राजधानी भोपाळमधील परिस्थिती अनियंत्रित झाली असून, मोठा तलाव पूर्णपणे भरला आहे. तलावात उभ्या असलेल्या बोटी वादळामुळे बुडण्याची भीती आहे. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्येही घडत आहे. बहुतांश धरणे, नद्या, तलाव भरले आहेत. पाऊस इतका पडला की पुढच्या वर्षी पाऊस पडला नाही तरी दुष्काळ पडणार नाही.

या राज्यात कमी पाऊसपण, तिकडे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडसह अनेक राज्ये पाण्यासाठी आसुसलेली आहेत. पिकांचे नुकसान झाल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 75 पैकी 64 म्हणजेच 85% जिल्हे असे आहेत, जिथे सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मान्सून आपला पॅटर्न कसा बदलतोय, हे अशा पद्धतीने समजून घ्या की, एकीकडे मध्य प्रदेश ओलाचिंब होत आहे, पण लगतचा उत्तर प्रदेश मात्र पाण्यासाठी तडफडत आहे. तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, मात्र लगतच्या केरळमध्ये अजूनही पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही.

अनेक राज्यांत मुसळधारजून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे भारतात मान्सूनचे हंगाम आहेत, त्याला दक्षिण पश्चिम मान्सून म्हणतात. भारताच्या वार्षिक पावसाची सुमारे 75% गरज नैऋत्य मान्सूनद्वारे भागवली जाते. त्यामुळे हे चार महिने पावसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण, या चार महिन्यांत अशी काही राज्ये आहेत ज्यांच्यावर ढग दयाळू आहेत. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये इतका पाऊस झाला की, पूर आणि भूस्खलनामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हिमाचलमध्ये आतापर्यंत फक्त सामान्य पाऊस झाला आहे. मात्र कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने नैसर्गिक घटना वाढल्या आहेत.

वाळवंटात मुसळधारअधिकाऱ्यांनी सांगितले की, 20 ऑगस्टपर्यंत राजस्थानमधील 716 धरणे त्यांच्या क्षमतेच्या 76% पाण्याने भरली आहेत. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत केवळ 57 टक्के पाणी भरले होते. यंदा एवढा पाऊस पडल्याने पुढील वर्षी पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी 23 ऑगस्टपर्यंत राजस्थानमध्ये सामान्यपेक्षा 51% जास्त पाऊस झाला आहे. येथील एकही जिल्हा कोरडा नाही. ओडिशात काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरापासून दिलासा मिळालेला नाही. नद्यांची पातळी कमी होत आहे, मात्र तरीही 902 गावांतील साडेसहा हजार लोक बाधित आहेत. राज्यातील जवळपास सर्वच नद्या धोक्याच्या पातळीखाली वाहत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :RainपाऊसfloodपूरRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशUttar Pradeshउत्तर प्रदेश