शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Kerala Floods : बीफ फेस्टिव्हलमुळे केरळमध्ये महाप्रलय, भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 16:36 IST

कर्नाटकातील भाजपाचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ आता केरळमध्ये आलेल्या महाप्रलयासंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - कर्नाटकातील भाजपाचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.  बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी आता केरळमध्ये आलेल्या महाप्रलयासंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'केरळमधील लोक बीफ खातात त्यामुळेच तिथे पूर आला, असे वादग्रस्त विधान पाटील यांनी केले आहे.

पाटील असं म्हणाले की,  'हिंदूंच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न झाला, तर धर्म त्यांना शिक्षा देईल. केरळमध्ये जे झाले आहे, ते याचे उदाहरण आहे. केरळला देवभूमी म्हटले जाते. पण येथे उघडपणे गोहत्या होतात.

केंद्र सरकारकडून पशू बाजारात जनावरे खरेदी-विक्रीवर बंदी आणल्यानंतर याचा विरोध दर्शवण्यासाठी जूनमध्ये केरळ काँग्रेसनं विधानसभेत बीफ फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. या फेस्टिव्हलच्या वर्षभराच्या आतच राज्यामध्ये पूर आला.  

दरम्यान, बीएस येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा दावाही त्यांनी यावेळेस केला आहे. पुढे ते असंही म्हणाले की, जेव्हा भाजपा सत्तेत येईल, तेव्हा आम्ही गोमांसावर बंदी घालू. तर दुसरीकडे त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्यावरही हल्लाबोल चढवला. पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी कुमारस्वामी मंदिर-मशिदींमध्ये पळताहेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरBJPभाजपाbeefगोमांसcongressकाँग्रेस