शहरं
Join us  
Trending Stories
1
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
2
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
3
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
5
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
6
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
7
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
8
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
9
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
10
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
11
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
12
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
13
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
14
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
15
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
16
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
17
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
18
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
20
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी

अन्न सुरक्षा कायदा संपूर्ण देशात लागू

By admin | Published: November 04, 2016 6:07 AM

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आता संपूर्ण देशात लागू झाला आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आता संपूर्ण देशात लागू झाला आहे. तामिळनाडू आणि केरळ आतापर्यंत या कायद्याच्या कक्षेबाहेर होते. तथापि, १ नोव्हेंबरपासून ही राज्येही पटलावर आली आहेत. या कायद्यामुळे ८० कोटी लोकांना सवलतीत धान्य मिळणार असून, केंद्राला त्यापोटी वार्षिक १ लाख ४0 हजार कोटी एवढे अनुदान द्यावे लागणार आहे. आम्ही सत्तेत आलो तेव्हा, केवळ ११ राज्यांत या कायद्याची अंमलबजावणी होत होती. मात्र, आता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात याचा अंमल सुरू झाली. धान्य थेट विक्रेत्यांच्या दरवाजापर्यंत पोहोचते करण्यात येत असून, विक्रेत्यांचे कमिशनही वाढविण्यात आले आहे, असे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान म्हणाले. केरळ आणि तामिळनाडू ही दोनच राज्ये राहिली होती. तेथेही १ नोव्हेंबरपासून हा कायदा लागू झाला. २०१३ मध्ये संसदेने संमत केलेल्या या कायद्यांतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीला केवळ एक ते तीन रुपये किलो दराने दरमहा ५ किलो धान्य पुरविणार आहे.ई-पीओएस उपकरणांद्वारे धान्य वितरणइलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल (ई-पीओएस) उपकरणाद्वारे धान्याचे वितरण करण्यासाठी स्वस्त धान्य दुकाने स्वयंचलित प्रणालीने जोडण्यात येत आहेत. हे उपकरण लाभार्थ्याची शहानिशा करण्यासह किती धान्य दिले याची नोंद ठेवते. सध्या १ लाख ६१ हजार ८५४ स्वस्त धान्य दुकानांत ई-पीओएस उपकरणांद्वारे धान्य वितरण सुरू आहे. धान्य पोहोचविण्यासाठी...सार्वजनिक वितरणव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून केंद्र धान्याची आंतरराज्यीय वाहतूक, हाताळणी आणि विक्रेत्याचे कमिशन याचा खर्च भागविण्यासाठी अर्थसाहाय्य पुरवीत आहे. २०१६-१७ मध्ये राज्यांना आतापर्यंत १,८७४ कोटी रुपये देण्यातआले आहेत, असे ते म्हणाले.>७१% शिधापत्रिका (रेशन कॉर्ड) आधार कार्डशी जोडण्यात आल्या असून, उर्वरित शिधापत्रिकाही लवकरच जोडल्या जातील. शिधापत्रिका आधार कार्डशी जोडण्याच्या प्रक्रियेमुळे २.६२ कोटी शिधापत्रिका वगळल्या गेल्या आहेत.>सवलतीतील धान्याचा भार 11726ू१ रुपये दरमहा