शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

५३ वर्षांपासून बहिणी समाधीवर बांधत आहेत राखी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 7:32 AM

भारत-पाकिस्तान सीमेवरील सिंबल गावातील असेही रक्षाबंधन 

- बलवंत तक्षक 

चंडीगड : भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या सिंबल या गावात एका समाधीवर या बहिणी ५३ वर्षांपासून राखी बांधत आहेत. १९७१ च्या भारत पाक युद्धात शहीद झालेले रेडिओ ऑपरेटर नायक कमलजित सिंह यांची आहे. बीएसएफ चौकीवर बांधलेल्या आपल्या भावाच्या समाधीवर जालंधरच्या अमृतपाल कौर गेली ४३ वर्षे अखंड राखी बांधत होत्या. 

आठ वर्षांपूर्वी कॅन्सरशी लढा देत अमृतपाल कौर यांनी हे जग सोडले. तरीही शहीद भावाच्या समाधीवर राखी बांधण्याची परंपरा कायम आहे. शहीद सैनिक परिवार सुरक्षा परिषदेचे सरचिटणीस कुंवर रवींद्र सिंह यांनी सांगितले की, आजारी असलेल्या अमृतपाल कौर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते रुग्णालयात गेले असता त्यांनी परिषदेच्या सदस्यांकडून वचन घेतले होते की, राखी बांधण्याची परंपरा थांबणार नाही. 

कमलजित ज्या गावात शहीद झाले त्या गावातील मनप्रीत कौर, हरप्रीत कौर, हरमन कौर, संदीप कौर, मनदीप कौर आणि मनप्रीत कौर यांनी शहीदांच्या कुटुंबीयांसह कमलजित यांच्या समाधीस्थळी राखी बांधून ५२ वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा कायम राखली. येथे तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनाही त्यांनी राखी बांधली. 

१९७१ मध्ये झाले जवान शहीदभारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ४ डिसेंबर १९७१ रोजी जेव्हा पाकिस्तानी सैन्याने या चौकीवर हल्ला केला तेव्हा कमलजित हे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. पाकिस्तानी लष्कराचा पराभव करत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी नंतर त्यांचे सहकारी रेडिओ ऑपरेटर नायक कमलजित यांच्या बलिदानाचा बदला घेतला होता.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन