शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! सभागृहात शिवीगाळ करणे भोवले; अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित
2
“हीच वेळ आहे, आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का”; मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल
3
BREAKING : टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा! BCCI ने अचानक संघ बदलला; तिघांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी
4
ऑल टाईम हाय नंतर Nifty, Sensex झाले रेंज बाऊंड; IT शेअर्स चमकले, Airtelमध्ये प्रॉफिट बुकिंग
5
राहुल गांधींच्या 'हिंदूं'वरील वक्तव्याने वाद; BJP खासदार बन्सुरी स्वराज यांनी बजावली नोटीस...
6
'सरकारला सत्य सहन होत नाही', भाषणातील काही भाग काढून टाकल्याने मल्लिकार्जुन खर्गे संतापले
7
"...तेव्हा का सूचलं नाही?", अंबादास दानवेंच्या निलंबनाची मागणी करताच संतापल्या सुषमा अंधारे! 
8
भाषणातून हटवलेले शब्द पाहून राहुल गांधी संतापले; सभापतींना पत्र लिहून सांगितले नियम
9
नेपाळच्याही संघात बाबर आझमला संधी मिळणार नाही; शोएब मलिकची सडकून टीका
10
राहुल गांधींच्या संसदेतील भाषणावर कंगना राणौत संतापली, म्हणाली - 'चांगलं स्टँडअप कॉमेडी होतं'
11
“भाजपाच्या टोळ्यांना असेच उत्तर दिले पाहिजे”; संजय राऊतांनी केली अंबादास दानवेंची पाठराखण
12
तो चेंडू रोहितकडे फेकणार होतो, पण...; त्या झेलवरील वादावर सूर्याचा मोठा गौप्यस्फोट
13
काँग्रेसवर हल्लाबोल, खासदारांना कानमंत्र..., NDA च्या बैठकीत PM नरेंद्र मोदी काय म्हणाले?
14
‘होई वही जो राम रचि राखा’, अयोध्येतील पराभवावरून अखिलेश यादवांचा भाजपा टोला
15
HDFCच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी UPI चालणार नाही, बॅलन्ससह 'या' सेवाही वापरता येणार नाहीत
16
"मनोज जरांगे-पाटील यांच्या घराची कोण टेहळणी करतंय? त्यांना संरक्षण द्या’’, विजय वडेट्टीवार यांची मागणी 
17
Ramdas Athawale : "राहुल गांधी हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत, काँग्रेसच दहशतवादी"; रामदास आठवलेंचा आरोप
18
"तेव्हा मी रात्रभर ढसढसा रडत होतो..."; गौतम गंभीरने सांगितला 'टीम इंडिया'बद्दलचा किस्सा 
19
चंद्र-मंगळ युती: ६ राशींवर महालक्ष्मीची असीम कृपा, परदेशी वारीचा योग, पद-प्रतिष्ठा वाढेल!

५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणासाठी संविधानात बदल करावा लागेल; काँग्रेसचा नितिशकुमारांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 5:49 PM

जदयूने बिहारमधील आरक्षण मर्यादा नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी प्रमुख विरोधी पक्षाची भुमिका आली आहे.

आरक्षणाची 50 टक्क्यांपेक्षा अधिक मर्यादा करण्याच्या नितीशकुमार यांच्या मागणीला काँग्रेसने आज पाठिंबा देणारी भुमिका घेतली आहे. यासाठी संसदेत कायदा संमत केला जावा असे वक्तव्य काँग्रेसने केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबतची पोस्ट केली आहे. 

जदयूने बिहारमधील आरक्षण मर्यादा नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी प्रमुख विरोधी पक्षाची भुमिका आली आहे. जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवारी पार पडली. यामध्ये उच्च न्यायालयाने बिहारचे वाढीव आरक्षण रद्द करण्यात आल्यावरून चर्चा करण्यात आली. 

बिहार सरकारने दिलेले ६५ टक्के आरक्षण रद्द करण्यात आले आहे. यावरून राजकीय ठरावही करण्यात आला आहे. यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला राज्य कायद्याचा राज्यघटनेच्या नवव्या अनुसूचीमध्ये आरक्षण मर्यादेच्या वाढीचा समावेश करण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे न्यायालयीन निर्णयांना टाळता येईल. 

जदयूने मागणी केली खरी परंतू केंद्रात आणि राज्यात त्यांचा मित्रपक्ष भाजपा मौन बाळगून असल्याची टीका रमेश यांनी केली आहे. 50 टक्के मर्यादेच्या पुढे आरक्षणाचे कायदे नवव्या अनुसूचीमध्ये आणणे हा काही उपाय नाहीय. कारण 2007 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार असे कायदे न्यायिक पुनरावलोकनाच्या अधीन आहेत. अशावेळी संसदेसमोर एकच पर्याय उरतो तो म्हणजे संविधानात संशोधन करणे, असे रमेश म्हणाले आहेत.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारcongressकाँग्रेसreservationआरक्षण