शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

राजीनामा देण्यास भाग पाडले!

By admin | Published: February 08, 2017 1:36 AM

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी पक्ष प्रमुख व्ही. के. शशिकला यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री बंडाचे निशाण फडकाविले

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी पक्ष प्रमुख व्ही. के. शशिकला यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री बंडाचे निशाण फडकाविले. मला पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे. तामिळनाडूची जनता, अद्रमुक कार्यकर्ते आणि आमदारांची इच्छा असेल तर मी राजीनामा मागे घेईन, असे सांगून पनीरसेल्वम यांनी बॉम्बगोळा टाकला. त्यांच्या या पवित्र्याने तामिळनाडूतील राजकीय घटनाक्रमाला वेगळे वळण मिळाले आहे.

दिवंगत जयललिता यांच्या मरिना येथील समाधीस्थळी रात्री ४० मिनिटे ध्यानमुद्रेत बसून पन्नीरसेल्वम यांनी राज्यासह देशाचे लक्ष्य वेधून घेतले. पक्षाच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग प्रशस्त व्हावा यासाठी पनीरसेल्वम यांनी पदाचा राजीनामा दिला होता. राज्यपालांनी पनीरसेल्वम यांचा राजीनामा स्वीकारला. तथापि, नवे सरकार स्थापन होईपर्यंत मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्यास सांगितले आहे.

पन्नीरसेल्वम म्हणाले वरदा येथील परिस्थिती मी यशस्वीरित्या हाताळल्यामुळे शशीकला यांना राग आला होता. जलिकट्टू माझ्यासाठी मोठा विजय होता केंद्र सरकारशी सतत चर्चा करून मी तो खेळ मिळवण्यात यशस्वी ठरलो,असे ते म्हणाले.केवळ लोकप्रिय नेताच मुख्यमंत्री बनू शकतो, असे म्हणून पन्नीरसेल्वम यांनी शशीकला यांचे आव्हान स्वीकारले आहे. जयललिता यांचा आत्मा माझ्याशी बोलला, असे सांगून पनीरसेल्वम म्हणाले की, ‘‘जयललितांचा आत्मा म्हणाला की काही सत्य तमिळनाडुच्या लोकांना सांग.’’ ते म्हणाले की जयललिता मला म्हणाल्या होत्या की लोकांना जो स्वीकारार्ह आहे अशा कोणा एकाची निवड करा.पनीरसेल्वम रात्री नऊ वाजता जयललितांच्या समाधीस्थळी पोहोचले.

पक्ष कार्यकर्ते किंवा सुरक्षा यंत्रणांना याचा थांगपत्ताही नव्हता. समाधीजवळ ते ४० मिनिटे ध्यानमुद्रेत होते. ९ वाजून ४० मिनिटांनी ध्यानमुद्रेतून बाहेर येऊन त्यांनी समाधीस्थळाला प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर ते पत्रकारांना सामोरे गेले. अद्रमुकसाठी मंगळवार हा प्रचंड राजकीय उलथापालथीचा दिवस ठरला. पन्नीरसेल्वम यांच्या बंडाच्या पवित्र्यापूर्वी पक्षाचे संस्थापक सदस्य पी. एच. पांडियन यांनी जयललितांचा मृत्यू आणि शशिकला यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून बॉम्ब टाकला होता. त्यानंतर दुपारी जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.

तमिळनाडूतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे चेन्नईला मंगळवारी किंवा बुधवारी रवाना होतील, असे राजभवनच्या सूत्रांनी सांगितले. राव यांच्याकडे तमिळनाडुच्या राज्यपालपदाचीही जबाबदारी आहे. अ. भा. राज्यपाल विद्यासागर राव सोमवारी रात्री दिल्लीहून चेन्नईला जाण्याऐवजी मुंबईला आल्यामुळे शशिकला यांचा ताबडतोब शपथविधी होईल ही शक्यताही विरळ झाली. बेहिशेबी मालमत्येच्या खटल्यात शशीकला यांच्याबाबतचा निवाडा लवकरच दिला जाईल, असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले होते.