शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

परराष्ट्र सचिव विजय गोखलेंसमोर अनेक आव्हाने, मुत्सद्दीपणाचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:10 IST

डोकलामच्यावरून चीनशी सुरू असलेला ७३ दिवसांचा वाद सोडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे मुत्सद्दी आणि अनुभवी परराष्ट्रविषयक तज्ज्ञ विजय गोखले यांनी सोमवारी परराष्ट्र सचिवपदाचा पदभार स्वीकारला. चीनसह शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचे मोठे आव्हान विजय गोखले यांच्यापुढे आहे.

नवी दिल्ली : डोकलामच्यावरून चीनशी सुरू असलेला ७३ दिवसांचा वाद सोडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे मुत्सद्दी आणि अनुभवी परराष्ट्रविषयक तज्ज्ञ विजय गोखले यांनी सोमवारी परराष्ट्र सचिवपदाचा पदभार स्वीकारला. चीनसह शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचे मोठे आव्हान विजय गोखले यांच्यापुढे आहे.शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. भारत आणि पाकिस्तानात तणाव कायम आहे. दक्षिण आशियातील मालदीव हा असा एकमेव देश आहे जिथे अद्याप मोदी यांनी दौरा केलेला नाही. चीनशी संबंध हळूहळू सुधारत आहेत. नेपाळशी संबंधही फारसे अनुकूल नाहीत किंवा ते चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत.भूतानमध्ये पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. बांंग्लादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबतचे संबंध कायम राहिले तरी, भारत - पाकिस्तानमधील संबंधातील गुंतागुंत कायम राहू शकते. त्यामुळे परराष्ट्र धोरणाकडे मोदी यांनी विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. मात्र, त्यांची व्यक्तिगत शैली जोखीम असलेली आहे. राष्ट्रीय सुरक्षा, गुंतवणूक, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, कौशल्य विकास हे सरकारचे निवडणुकीचे मुद्दे असतील.आखती देशांशी चांगले संबंधअमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पॅरिस करारातून घेतलेली माघार असो की, जेरुसेलमला इस्रायलची राजधानी जाहीर केल्याचे प्रकरण असो, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशा अनेक घडामोडी घडत असताना त्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटत आहेत. मोदी सरकारने आखाती देशांशी संबंधातही चांगली सुधारणा केली आहे.या भागात ७ लाख भारतीय राहतात. संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्याशीही संबंधात सुधारणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र धोरण आगामी काळातकोणते वळण घेते ते भविष्यात स्पष्ट होणार आहे. त्यासाठी विजय गोखले यांच्या मुत्सद्दीपणाचा मात्र कस लागणार आहे.

टॅग्स :Vijay Gokhaleविजय गोखलेIndiaभारतGovernmentसरकार