शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

आशेचा किरण! भूस्खलनानंतर केरळच्या जंगलात चमत्कार; ५ दिवसांनंतर ४ मुलांना वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 10:14 AM

वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात अजूनही लोक बेपत्ता आहेत. या भीषण आपत्तीदरम्यान, एक दिलासादायक घटना समोर आली आहे.

केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात अजूनही लोक बेपत्ता आहेत. या भीषण आपत्तीदरम्यान, एक दिलासादायक घटना समोर आली आहे. जिथे भूस्खलनग्रस्त वायनाडमध्ये केरळच्या वन अधिकाऱ्यांनी आठ तासांच्या ऑपरेशननंतर दुर्गम आदिवासी वस्तीतून ६ जणांची सुटका केली आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, "आम्ही एकजुटीने पुन्हा उभं राहू" असं म्हटलं आहे. कलपेट्टा परिक्षेत्राचे वन अधिकारी के. हशीस यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय पथकाने गुरुवारी एका आदिवासी कुटुंबाला वाचवण्यासाठी जंगलातील धोकादायक रस्ता ओलांडून ही बचाव मोहीम यशस्वी केली. सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये आदिवासी समाजातील एक ते चार वर्षे वयोगटातील चार मुलांचा समावेश आहे.

वायनाडच्या पनिया समुदायातील हे कुटुंब डोंगरमाथ्यावरील एका गुहेत अडकलं होतं. बाजुला खोल दरी होती आणि तिथे पोहोचण्यासाठी टीमला साडेचार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. पीटीआयशी बोलताना, हशीस म्हणाले की, त्यांनी गुरुवारी आई आणि चार वर्षांच्या मुलाला वनक्षेत्राजवळ भटकताना पाहिलं आणि चौकशी केल्यावर कळलं की त्यांची इतर तीन मुलं आणि त्यांचे वडील अन्नाविना गुहेत अडकले आहेत.

हशीस म्हणाले की, हे कुटुंब आदिवासी समाजाच्या एका विशेष वर्गातील आहेत, जे सहसा बाहेरील लोकांशी संवाद करणं टाळतात. ते सामान्यतः जंगलात मिळणाऱ्या गोष्टींवर अवलंबून असतात. मात्र भूस्खलन आणि अतिवृष्टीमुळे त्यांना आता अन्न मिळू शकलेलं नाही. आम्ही आमच्याबरोबर जे काही अन्नपदार्थ घेतले होते ते आम्ही त्यांना दिलं. खूप समजावून सांगितल्यावर, मुलांचे आई-वडील आमच्यासोबत यायला तयार झाले.  

टॅग्स :KeralaकेरळRainपाऊस