शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 12:28 IST

वसीम रिझवी यांनी हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे हिंदू नाव हरबीर नारायण सिंह त्यागी झाले आहे.

गाझियाबाद: शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी आज हिंदू धर्म स्वीकारला आहे. गाझियाबादमधील डासना येथील देवीच्या मंदिरात नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांचा हिंदू धर्मात समावेश केला. धर्म बदलल्यानंतर त्यांचे नवीन नाव हरबीर नारायण सिंह त्यागी झाले आहे. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांना सनातन धर्म मिळवून दिला आणि त्यानंतर रिझवी यांचे नाव बदलले. यावेळी नरसिंहानंद सरस्वती म्हणाले की, आम्ही वसीम रिझवी यांच्यासोबत आहोत.

इस्लाममधून मला बहिष्कृत केले

हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर रिझवी म्हणाले की, मला आमच्याच लोकांनी इस्लाममधून बहिष्कृत केले, त्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. सनातन धर्म हा जगातील पहिला धर्म असून त्यात चांगुलपणा आणि मानवता आढळते. आम्ही इस्लामला धर्म मानत नाही. मोहम्मद पैगंबरांनी निर्माण केलेला इस्लाम हा धर्म वाचून आणि त्यांचा दहशतवादी चेहरा पाहिल्यानंतर तो धर्म नाही हे मला समजले आहे.

इस्लाम दहशतवादी गट

ते पुढे म्हणाले की, इस्लाम हा एक दहशतवादी गट आहे, जो 1400 वर्षांपूर्वी अरबस्तानमध्ये तयार झाला होता. प्रत्येक जुम्मा प्रार्थनेनंतर, आम्हाला मुंडके कापण्यास सांगितले जाते. मला मुस्लिम म्हणायला लाज वाटते, म्हणून मी सनातन धर्म स्वीकारला आहे. मी सनातन धर्म निवडला कारण तो जगातील सर्वात जुना धर्म आहे. वसीम रिझवी यांनी सनातन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे, तसेच हवन-यज्ञही होणार आहे. महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांच्या देखरेखीखाली सर्व विधी पार पडणार आहेत. 

काही दिवसांपूर्वीच जारी केले मृत्यूपत्र वसीम रिझवी यांनी काही दिवसांपूर्वीच मृत्यूपत्र जारी केले आहे. यात त्यांनी घोषणा केली आहे, की मृत्यूनंतर आपले दफन करण्यात येऊ नये, तर हिंदू परंपरेप्रमाणेच आपल्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत. एवढेच नाही, तर यती नरसिंहानंद यांनी आपल्या चितेवर अग्नीसंस्कार करावेत, असेही रिझवी यांनी म्हटले होते.

कुराणातील 26 आयत हटवण्यासाठी याचिका दाखल केली होती

वसीम रिझवी मूळचे लखनऊचे आहेत. सन 2000 मध्ये ते लखनऊच्या मोहल्ला काश्मिरी वॉर्डातून सपाचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 2008 मध्ये ते शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य झाले आणि नंतर चेअरमन झाले. वसीम रिझवी यांनी कुराणातील 26 आयत काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण कोर्टाने ती फेटाळून लावली. या याचिकेसाठी सर्वोच्च न्यायालयाने वसीम रिझवी यांना दंडही ठोठावला होता. 

'मोहम्मद' पुस्तकातून चर्चेतरिझवी आता पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतेच 'मोहम्मद' हे पुस्तक लिहिले होते. यावरुन राजकीय खळबळ उडाली आहे. रिझवी यांनी या पुस्तकाद्वारे पैगंबरांच्या गौरवाचा अपमान केला आहे, अशी प्रतिक्रिया मुस्लिम धर्मगुरुंनी व्यक्त केली आहे. त्यानंतर वसीम रिझवींनी एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात त्यांनी ठार मारण्याचा आणि शिरच्छेद करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. 

टॅग्स :HinduहिंदूIslamइस्लाम