शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

‘जननायक’ ‘भारतरत्न’...मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी मारली होती सत्तेला लाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 8:21 AM

बिहारचे माजी मुख्यमंत्री स्व. कर्पूरी ठाकूर यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर झाला.

मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठीच्या शिफारसींना विरोध झाला म्हणून सत्तेला लाथ मारणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री स्व. कर्पूरी ठाकूर यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने ही घाेषणा केली. ‘जननायक’ म्हणून त्यांना ओळखले जात हाेते.  कर्पूरी ठाकूर हे २२ डिसेंबर १९७० ते २ जून १९७१ आणि २४ जून १९७७ ते २१ एप्रिल १९७९ या कालावधीत दाेन वेळा बिहारचे मुख्यमंत्री हाेते. त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही हाेती. त्यांचा जन्म समस्तीपूर जिल्ह्यातील पिताैझिया गावात झाला हाेता. ‘छाेडाे भारत’ चळवळीदरम्यान ते २६ महिने तुरुंगात हाेते.

प्रथमच बिगर काॅंग्रेसी सरकार केले स्थापनशिक्षक असलेले ठाकूर हे १९५२ मध्ये साेशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर सर्वप्रथम बिहार विधानसभेवर ताजपूर मतदारसंघातूननिवडून गेले. त्यांच्या नेतृत्वात १९६७च्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त साेशलिस्ट पार्टी माेठ्या ताकदीने उभी राहिली हाेती. त्यामुळेच बिहारमध्ये प्रथमच बिगर काॅंग्रेसचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी कर्पूरी ठाकूर उपमुख्यमंत्री बनले.

मुख्यमंत्री हाेते, मुलीसाठी टॅक्सीने गेलेकर्पूरी ठाकूर हे गरीब नेते म्हणून ओळखले जायचे. भत्त्यांशिवाय एकही अतिरिक्त रुपया त्यांनी घेतला नाही. त्यांच्या मुलीसाठी मुलगा बघण्यासाठी त्यांना रांची येथे जायचे हाेते. मुख्यमंत्री असूनही त्यांनी सरकारी वाहन न घेता टॅक्सीचा वापर केला.  

विमानही उतरु दिले नाहीपत्नीच्या इच्छेखातर मूळ गावी मुलीचा विवाह झाला. विवाहासाठी माेजक्या कुटुंबियांनाच बाेलावले हाेते. एवढेच नव्हे, तर त्या दिवशी दरभंगा आणि सहरसा येथील विमानतळांवर एकही विमान उतरणार नाही, असे त्यांनी आदेश दिले हाेते. जेणेकरुन काेणीही नेता लग्नाला येणार नाही. मुख्यमंत्री गावात असल्याचे पाेलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दाेन दिवसांनी कळाले. ते गावी पाेहाेचले तेव्हा एवढा साधा माणूस मुख्यमंत्री असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला हाेता. 

म्हणून बनले ‘जननायक’कर्पूरी ठाकूर यांनी अनेक आंदाेलने केली. त्यांचा संबंध थेट जनतेशी हाेता. त्यासाठी अनेकदा त्यांना तुरुंगात जावे लागले. मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांना ‘जननायक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते हिंदी भाषेचे पुरस्कर्ते हाेते. शिक्षण मंत्री असताना त्यांनी इंग्रजी हा अनिवार्य विषय म्हणून दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातून वगळला हाेता. बिहारच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीमुळे नुकसान हाेत असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले, असे त्यावेळी बाेलले गेले. 

‘तपस्येचे फळ मिळाले’कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर पुत्र रामनाथ ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला. बिहारच्या जनतेच्यावतीने आभार मानले. आम्हाला ३६ वर्षांच्या तपस्येचे फळ मिळाले, असे ते म्हणाले.

टॅग्स :BiharबिहारCentral Governmentकेंद्र सरकार