शहरं
Join us  
Trending Stories
1
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
2
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
3
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
4
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
5
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
6
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
7
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
8
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
9
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
10
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
12
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
13
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
14
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
15
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
16
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
17
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
18
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
19
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
20
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos

'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 3:23 PM

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पंतप्रधाने नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीसह ५ मुद्द्यांवर उत्तर देण्याचे आवाहन केले आहे. केजरीवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण हे पत्र राजकीय पक्षाच्या नेत्याच्या भूमिकेत नसून एक सामान्य नागरिक म्हणून लिहिले आहे. भागवत उत्तर देतील अशी आशा त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की,  देशातील परिस्थितीमुळे आपण चिंतेत आहोत. भाजपचे केंद्र सरकार देशाला आणि देशाच्या राजकारणाला ज्या दिशेने घेऊन जात आहे ते संपूर्ण देशासाठी घातक आहे. असेच चालू राहिले तर आपली लोकशाही संपेल, आपला देश संपेल. पक्ष येतील आणि जातील, निवडणुका येतील आणि जातील, नेते येतील आणि जातील, परंतु भारत नेहमीच देश राहील. या देशाचा तिरंगा सदैव स्वाभिमानाने आकाशात फडकत राहावा ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

माजी मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आमचा उद्देश फक्त भारतीय लोकशाही वाचवणे आणि मजबूत करणे हा आहे.ते जे प्रश्न विचारत आहेत ते जनतेच्या मनात आहेत. ईडी-सीबीआयच्या लोभ आणि धमक्यांमुळे इतर पक्षांच्या नेत्यांचा पराभव केला जात आहे आणि सरकार पाडले जात आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. अप्रामाणिकपणाने सत्ता मिळवणे तुम्हाला किंवा आरएसएसला मान्य आहे का?, असा सवालही केजरीवाल यांनी केला. 

"पंतप्रधान आणि अमित शहा ज्या नेत्यांना भ्रष्ट म्हणत होते, त्यांचा काही दिवसांनी भाजपमध्ये समावेश झाला. तुम्ही किंवा संघ कार्यकर्त्यांनी अशी भाजपची कल्पना केली होती का? हे सगळं बघून तुम्हाला त्रास होत नाही का? तिसऱ्या प्रश्नात केजरीवाल यांनी भागवत यांना विचारले आहे की, पंतप्रधानांना हे सर्व करण्यापासून तुम्ही कधी रोखले का?, असंही केजरीवाल म्हणाले. 

तो कायदा मोदींना लागू होणार नाही का?

पुढे केजरीवाल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्यावेळी जेपी नड्डाजी म्हणाले होते की, भाजपला आता आरएसएसची गरज नाही. मला कळले की नड्डाजींच्या या विधानाने प्रत्येक संघ कार्यकर्ता दुखावला आहे. देशाला जाणून घ्यायचे आहे की, त्यांच्या वक्तव्यामुळे तुमच्या मनाला काय वाटले? पुढे केजरीवाल यांनी शेवटच्या प्रश्नात पीएम मोदींच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, वयाच्या ७५ व्या वर्षी निवृत्तीचा कायदा करून अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी यांसारखे शक्तिशाली नेते निवृत्त झाले. तो कायदा मोदींना लागू होणार नाही, असे अमित शहा म्हणाले. तुम्ही याच्याशी सहमत आहात का? कायदे सर्वांसाठी सारखेच नसावेत का? केजरीवाल म्हणाले, 'हे प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. तुम्ही या प्रश्नांचा विचार कराल आणि जनतेला या प्रश्नांची उत्तरे द्याल अशी मला मनापासून अपेक्षा आहे, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत